[ad_1]
बिहारच्या राजकारणात संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. राजकीय पक्षांचे प्रमुख नेते त्यांच्या आमदारांकडे संशयाच्या नजरेनं पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांचं एक वक्तव्य चर्चेत आहे, ते म्हणजे खेला तर होणार आहे. दुसरीकडे काँग्रेसनं त्यांचे आमदार तेलंगाणामध्ये पाठवले आहेत.
विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेमुळं सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं
बिहार विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळं सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. अवध बिहारी चौधरी अविश्वास ठरावाला सामोरं जाणार आहेत. यापूर्वी शिवचंद्र झा, विंदेश्वरी वर्मा आणि विजय सिन्हा यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला गेला होता. त्या अध्यक्षांनी अविश्वास प्रस्ताव राजीनामा दिला होता.
अवध बिहारी चौधरी अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणेर पहिले अध्यक्ष आहेत. त्यांनी पत्रकारांशी बोलताना राजीनामा देणार नसल्याचं म्हटलं. अविश्वास प्रस्तावाचा सभागृहात सामना करणार आहे. यामुळं सत्ताधारी आमदारांमध्ये फूट पडू शकेल की काय असं भीतीचं वातावरण आहे.
अवध बिहारी चौधरी यांचे भाऊ आणि राजद आमदार असलेल्या वीरेंद्र यांनी खेळ १२ फेब्रुवारीला होईल असं म्हटलं. नितीशकुमार देखील घाबरले असून त्यामुळं ते नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले होते, असा आरोप त्यांनी केला. जदयूच्या आमदारांमध्ये नितीशकुमारांबाबत नाराजी आहे. यामुळं नितीशकुमार अधिकाऱ्यांना प्राधान्य देतात. यामुळं १२ जानेवारीला खरा खेळ पाहायला मिळेल, असं रवींद्र यांनी म्हटलं.
जदयूचे मंत्री श्रवणकुमार यांनी देखील त्यांच्या आमदारांना फोन येत असल्याचं म्हटलं. जदयूच्या आमदारांचा नितीशकुमार यांच्यावर विश्वास असल्याचं ते म्हणाले.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या दाव्यानुसार सरकारकडे पूर्ण बहूमत आहे. एनडीए कडे बहुमतापेक्षा अधिक संख्याबळ आहे. तेजस्वी यादव यांच्या दाव्यात तथ्य असल्यास ते अविश्वास प्रस्ताव आणून सरकार पाडू शकतात. जदयूचे काही आमदार गैरहजर राहिल्यास नितीशकुमारांचा खेळ बिघडू शकतो. नितीशकुमारांना बहुमत सिद्ध करण्यास अपयश येतं आहे असं दिसल्यास ते मंत्रिमंडळाच्या परवानगीनं विधानसभा भंग करु शकतात, किंवा राज्यपालांना सांगून राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करु शकतात.
[ad_2]
Source link