[ad_1]

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० ऑगस्ट रोजी अविश्वास प्रस्तावावर बोलताना संसदेत विरोधकांवर जोरदार हल्ला बोल केला. विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे लोक असे का करतात आणि असे का घडते, मी त्याचे रहस्य सभागृहात उघड करणार आहे. त्यांनी म्हटले की, आता विरोधी पक्षातील लोकांना छुपे वरदान मिळाले आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. विरोधी पक्षाला ज्याच्याबाबत वाईट वाटते त्याचे चांगलेच होते. बँकिंग क्षेत्र, HAL आणि एलआयसीवरील विरोधकांच्या आरोपांवर त्यांनी सडेतोड उत्तर दिले.

बँकिंग क्षेत्रावर पंतप्रधान मोदींचे भाष्य
पंतप्रधान मोदी म्हणाले की देशातील बँकिंग क्षेत्र उद्ध्वस्त झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. आपला मुद्दा मांडण्यासाठी परदेशातून मोठमोठे विधवांना आणले, देशात अफवा पसरवल्या. आज आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निव्वळ नफा दुपटीने वाढला आहे. एनपीएवर मात करून आम्ही बँकिंग क्षेत्र मजबूत केले. पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा बँकांचे वाईट करण्याची त्यांची इच्छा होती तेव्हा काय झाले, आमच्या सरकारी बँकांचा निव्वळ नफा दुपटीने वाढला आहे. तत्पूर्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची संपूर्ण तपशीलवार माहिती दिली.

मणिपूरचा वापर राजकारणासाठी करू नका, अविश्वास प्रस्तावावरून PM मोदींनी विरोधकांना सुनावलं
HAL आणि LIC वर पंतप्रधान मोदींचे भाष्य
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळावरील (एलआयसी) विरोधकांच्या आरोपांबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधकांच्या आरोपांना न जुमानता HAL देशाची शान म्हणून समोर आली आहे. विरोधकांनी जागतिक स्तरावर एचएएलची प्रतिमा डागाळली, एचएएल बंद होणार असल्याचे सांगितले, कर्मचाऱ्यांना भडकावण्याचे काम केले. संरक्षण हेलिकॉप्टर बनवणारी कंपनी एचएएलबद्दल चांगल्या आणि वाईट गोष्टी सांगितल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाआधी मोठा राडा; काँग्रेसचे काँग्रेसचे खासदारांनी पाहा मोदींची तुलना कोणाशी केली

२०१८ ची आठवण सांगत मोदी म्हणाले, २०२४ मध्ये एनडीए, भाजप रेकॉर्डब्रेक करून पुन्हा येणार!

त्यांनी म्हटले की HAL संपली, नष्ट झाली. HAL बद्दल काय-काय नाही बोलले. पीएम मोदी म्हणाले की, आज एचएएल सर्वाधिक कमाई करणारी संस्था बनली असून ते यशाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे. HAL ने आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल नोंदवला असं आज एचएएल देशाची शान आणि अभिमान म्हणून उदयास आली आहे. विरोधकांच्या गदारोळात पंतप्रधान म्हणाले की एलआयसी बुडत आहे. गरिबांचा पैसा कुठे जाणार? आज LIC सतत मजबूत होत आहे. पंतप्रधान म्हणाले की LIC आज शेअर बाजारात चांगली कामगिरी करत आहे.

नाव चोरले, इंडियाचे तुकडे केले; मोदींनी काँग्रेससह विरोधकांच्या नव्या आघाडीचा समाचार घेतला
शेअर बाजारात गुंतवणूकीचे सूत्र
अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधानांनी लोकांना शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा फॉर्म्युला सांगितला. ज्या सरकारी कंपन्यांवर विरोधक टीका करतात, अविश्वास दाखवतात त्यात पैसा टाका तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल. ज्या प्रकारे ते देशाला आणि लोकशाहीला शिव्याशाप देत आहेत, त्याच पद्धतीने देश-लोकशाही मजबूत होणार आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *