[ad_1]

नाशिक: कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या निर्यातविषयक अडचणी मोठ्या आहेत. याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. केंद्रस्तरापर्यंत या अडचणी सोडविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यासाठी शासन हे काम हाती घेते आहे. यातून कांदा व द्राक्षांच्या निर्यातदृष्टीकोनातून काही सकारात्मक तोडगा हाती येईल, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग, आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यातर्फे नाशिक कृषी व नव तेजस्विनी महामहोत्सव यांच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. दि. १४ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणार; अमित शहा यांची माहिती
पालकमंत्री भुसे पुढे म्हणाले, ‘आदर्श शेतकरी पुरस्कार २०२४’ यामुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे. केंद्र शासनाद्वारे सहा हजार व महाराष्ट्र शासनाद्वारे ‘नमो शेतकरी योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सुद्धा वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. केंद्र व राज्य शासनाद्वारे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. एक रुपयात पीक विमा देणारे देशात महाराष्ट्र एकमेव राज्य असल्याचे भुसे यांनी सांगितले.

यंदा पाऊस कमी झाल्याने पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पेयजलाचे व शेतीपाण्याच्या नियोजनाची कार्यवाही सुरू असून, प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळावे यासाठी सूक्ष्म नियोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ, जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

मी पण मराठाच, पुण्याबाबत खासदार बारणेंचा प्रश्न, ज्योतिरादित्य सिंधियांचं खणखणीत मराठीत उत्तर

कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री भुसे यांनी महोत्सवाचे उद्घाटन करून प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी मातीपूजन देखील करण्यात आले. प्रास्ताविक राजेंद्र निकम यांनी केले. पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते प्रगतशील शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

दहा कोटींचे कृषी भवन मंजूर
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नुकतेच इगतपुरी येथे १० कोटी रुपयांचे कृषी भवन मंजूर झाले आहेत. मालेगाव येथे पाच कृषी महाविद्यालये मंजूर आहेत. त्याचेही काम प्रगतीपथावर आहे. या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचे चांगले परिणाम येत्या काळात दिसून येतील, असा आशावादही भुसे यांनी व्यक्त केला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *