[ad_1]

अमेरिका : भारत आणि पाकिस्तानमधील सामना म्हणजे जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी असते. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक हा सामना पाहायला विशेष गर्दी करतात. त्यातच विश्वचषक २०२३ मधील भारत आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी प्रत्येक क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने अलीकडेच आगामी आशिया चषक २०२३ आणि पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यांबद्दल भाष्य केले. रोहितला पाकिस्तानच्या सर्वात धोकादायक गोलंदाजाचा सामना करण्याबाबत विचारण्यात आले होते. पाकिस्तानच्या कोणत्या गोलंदाजाची हिटमॅनला भीती वाटते याचे त्याने काय उत्तर दिले; पाहा व्हिडीओ.

अमेरिकेतील एका कार्यक्रमात रोहितला क्रिकेटबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. आगामी आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकाशी संबंधित काही प्रश्नही उपस्थित होते. यावेळी त्याला विचारण्यात आले की, त्याला पाकिस्तानमधील सर्वात कठीण चेंडू कोण आहे? हा प्रश्न ऐकून रोहित काही क्षण गप्प बसला आणि मग मुंबई स्टाईलमध्ये उत्तर दिलं.

रोहितने कोणाचं नाव घेतलं?

रोहित शर्मा आपल्या शानदार शैलीत उत्तर देण्यासाठीही ओळखला जातो. या प्रश्नावरही रोहितने आपल्या खास शैलीत मजेशीर उत्तर दिले आहे. गोलंदाजाचे नाव घेतल्याने वाद निर्माण होऊ शकतो हे जाणून रोहितने त्याला उत्तर देणे टाळले. अमेरिकेतील एका कार्यक्रमात रोहित म्हणाला, “पाकिस्तान संघात सर्व चांगले खेळाडू आहेत. मी कोणाचेही नाव घेणार नाही. पाकिस्तान संघातील सर्व वेगवान गोलंदाज तितकेच चांगले आहेत. मी कोणालाही निवडणार नाही. त्यामुळे मोठा वाद निर्माण होतो.” पुढे म्हणाला, “एखाद्याचं नाव घेतलं तर दुसऱ्याला वाईट वाटतं. दुसऱ्याचे घेतले तर तिसऱ्याला ते आवडत नाही. मला वाटते सर्वच चांगले आहेत.”


येत्या चार महिन्यांत अनेक वेळा पाकिस्तानचा भारताशी सामना होणार आहे. प्रथम, आशिया चषक स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये भारत दोनदा पाकिस्तानशी भिडणार आहे आणि त्यानंतर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर ते तिसऱ्यांदा आमनेसामने येतील. पुढे, एकदिवसीय विश्वचषक आहे ज्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत पाकिस्तानशी भिडणार आहे.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

रोहित शर्मा ब्रेकवर

वेस्ट इंडिज दौऱ्यावरील कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर रोहित शर्मा ब्रेकवर आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. अशा स्थितीत ब्रेकनंतर तो आशिया कपमध्ये टीम इंडियासाठी मैदानात उतरणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *