[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, ठाणे :‘आधी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार आहोत, त्यानंतर विधानसभा निवडणुका आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला लोकसभेची प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यात जास्तीतजास्त जागा या महायुतीच्या कशा निवडून येतील, याबद्दलची आखणी प्रथम प्राधान्याने आम्ही करत आहोत’, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी ठाण्यात केले.

शरद पवारांचं पंतप्रधानपद कुणामुळे हुकलं?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी ही माहिती दिली. तसेच काँग्रेसमुळेच शरद पवार यांचे पंतप्रधानपद हुकल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाला उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला. ‘अशा प्रकारचे प्रसंग दोन, तीन वेळी आले होते, पण अपेक्षित यश मिळाले नाही’, याची आठवण अजित पवार यांनी यावेळी करून दिली.

सव्वा कोटींच्या दंडाचं प्रकरण, १५ लाखांच्या लाचेची मागणी, तहसीलदार रंगेहात सापडला, विभागीय आयुक्तांनी दणका दिला
विधानसभेच्या निवडणुकांचे जागावाट कसं होणार?

‘ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन कार्यालयावर माझे लक्ष राहणार आहे. हे कार्यालय सर्वसामान्य जनतेसाठी उघडे आहे की नाही, हे मी मुंबईला येता-जाताना पाहणार आहे. क्रांतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवीन क्रांती घडवणार आहे’, असे मत उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यालयाच्या उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केले. दरम्यान, लोकसभा निवडणुका झाल्यावर विधानसभेच्या निवडणुकांचे जागावाटप, कोणत्या जागा कोणाला द्यायच्या, याचा निर्णय घेतला जाईल, असेही पवार यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

राहुल गांधींवर फ्लाईंग किसचा आरोप, लोकसभेच्या एक्झिट दाराजवळ काय घडलं? वाचा आँखो देखी….
जरा संयम बाळगा, मीही संयम बाळगतो, दादांच्या उत्तराने हशा पिकला

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना माध्यम प्रतिनिधींच्या दुसऱ्या एका प्रश्नादरम्यान उपस्थितांनी गोंधळ केल्याने ‘जरा संयम बाळगा, मीही संयम बाळगतो’, अशा आशयाची टिप्पणी पवार यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

एकनाथ शिंदे यांना झटका, वारं फिरलं, आतापर्यंत इनकमिंग होतं, आता आऊटगोईंगला सुरूवात!
‘अंतिम निर्णय न्यायव्यवस्थेचा’

‘वेगवेगळे घटक आरक्षण मागतात. यामध्ये मराठा, धनगर समाज आरक्षण मागतो. इतरही वेगवेगळे समाज आरक्षण मागतात. काही वर्ग त्यांचा ओबीसीमध्ये समावेश झाला नसल्यावर त्यांचा ओबीसी समाज करावा म्हणून मागणी आहे. शेवटी अंतिम निर्णय हा न्याय व्यवस्थेचा आहे’, असे पवार यांनी सांगितले.

CM यांच्या बालेकिल्ल्यात जंगी स्वागत, कार्यकर्त्यांची तुफान गर्दी अन् पक्ष कार्यालयाचं दणक्यात उद्घाटन!

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *