[ad_1]
शरद पवारांचं पंतप्रधानपद कुणामुळे हुकलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी ही माहिती दिली. तसेच काँग्रेसमुळेच शरद पवार यांचे पंतप्रधानपद हुकल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाला उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला. ‘अशा प्रकारचे प्रसंग दोन, तीन वेळी आले होते, पण अपेक्षित यश मिळाले नाही’, याची आठवण अजित पवार यांनी यावेळी करून दिली.
विधानसभेच्या निवडणुकांचे जागावाट कसं होणार?
‘ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन कार्यालयावर माझे लक्ष राहणार आहे. हे कार्यालय सर्वसामान्य जनतेसाठी उघडे आहे की नाही, हे मी मुंबईला येता-जाताना पाहणार आहे. क्रांतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवीन क्रांती घडवणार आहे’, असे मत उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यालयाच्या उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केले. दरम्यान, लोकसभा निवडणुका झाल्यावर विधानसभेच्या निवडणुकांचे जागावाटप, कोणत्या जागा कोणाला द्यायच्या, याचा निर्णय घेतला जाईल, असेही पवार यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.
जरा संयम बाळगा, मीही संयम बाळगतो, दादांच्या उत्तराने हशा पिकला
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना माध्यम प्रतिनिधींच्या दुसऱ्या एका प्रश्नादरम्यान उपस्थितांनी गोंधळ केल्याने ‘जरा संयम बाळगा, मीही संयम बाळगतो’, अशा आशयाची टिप्पणी पवार यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
‘अंतिम निर्णय न्यायव्यवस्थेचा’
‘वेगवेगळे घटक आरक्षण मागतात. यामध्ये मराठा, धनगर समाज आरक्षण मागतो. इतरही वेगवेगळे समाज आरक्षण मागतात. काही वर्ग त्यांचा ओबीसीमध्ये समावेश झाला नसल्यावर त्यांचा ओबीसी समाज करावा म्हणून मागणी आहे. शेवटी अंतिम निर्णय हा न्याय व्यवस्थेचा आहे’, असे पवार यांनी सांगितले.
[ad_2]
Source link