[ad_1]
मुंबई: सरकारच्या विरोधात सर्वत्र असंतोष आहे. मात्र धारावीत असंतोष जास्त आहे. मी तुमच्यासाठी लढायला उतरलो आहे. तुम्ही सोबत राहणार आहात की नाही, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी धारावीकरांना विचारला आहे. ते आज धारावीत बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात गुंडागर्दी वाढत असल्याचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज धारावीत आले होते. त्यांनी आज धारावीकरांसोबत संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, विरोधकांच्या मागे काही लावून द्यायचं आणि त्यांना फोडून आपल्या पक्षात घ्यायचं. आपल्यातील नाही मात्र इथले तिथले काही लोक त्यांच्यात गेले आहेत. विकाऊ माल विकला गेला हरकत नाही. मात्र माझे निष्ठावंत मावळे माझ्यासोबत आहेत तोपर्यंत चिंता नाही.
[ad_2]
Source link