[ad_1]

डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : परभणी लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून बुधवारी बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली होती. मात्र रात्रीतून चक्र फिरल्यानंतर गुरुवारी ४ एप्रिल रोजी हवामान अभ्यासक पंजाबराव देशमुख यांच्या नावाची घोषणा झाली. गुरुवारी डख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

परभणी लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या दोघात तिसरा उमेदवार कोण येणार याची उत्सूकता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी रात्री उशीरा अंबड तालुक्यातील बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या उमेदवारीने पक्षातील पदाधिकारी नाराज होते. माजी जिल्हाध्यक्ष आलमगिर खान यांनी वंचितच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे काल पाठवला होता.
रामटेकमध्ये वंचितची खेळी, जाहीर उमेदवाराचं तिकीट कापलं, काँग्रेसच्या बंडखोराला पाठिंबा

मात्र बाबासाहेब उगले हे औट घटकेचे उमेदवार ठरले. गुरुवार ४ एप्रिल रोजी राजकीय घडामोडी होऊन सेलू तालुक्यातील हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी पंजाबराव डख यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे सादर केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विभागीय प्रवक्ता डॉ. धर्मराज चव्हाण, जिल्हा सरचिटणीस सुमित जाधव यांची उपस्थिती होती.
भावना गवळींच्या मतदारसंघात बदलांचे वारे, वंचितनेही जाहीर केलेला उमेदवार फिरवला

डख यांच्या उमेदवारीचे वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. पंजाबराव डख हे हवामान अभ्यासक असल्यामुळे ते शेतकऱ्यांच्या घराघरात पोहचलेले आहेत. लोकसभा मतदार संघासह मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही ते परिचित आहेत. त्यामुळे पंजाबराव डख हे निर्णायक मते घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

चिखलीकर अन् वसंत चव्हाणांना जिल्हा कंटाळला, वंचितच्या उमेदवाराची टीका

दरम्यान, बसपाच्या आलमगीर खान यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली. वंचित बहुजन आघाडीने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मला उमेदवारी दिली होती पण यावेळी त्यांनी एक मराठा उमेदवार दिला आहे. भाजपाला फायदा व्हावा यासाठीच वंचित बहुजन आघाडीने मराठा उमेदवार दिला. भाजपकडून ओबीसी मराठा असा थेट संघर्ष व्हावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून तगडा मराठा उमेदवार वाचल्याने महायुतीचा ओबीसी उमेदवार निवडून आणण्यासाठीच वंचितने देखील मराठा उमेदवार दिला असल्याची टीका आलमगीर खान यांनी केली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *