[ad_1]

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं आणखी तिघांना भारतरत्न जाहीर केला आहे. माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि शास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. गेल्या १७ दिवसांत सरकारनं पाच जणांना भारतरत्न जाहीर केला आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना केंद्र सरकारनं पाच जणांना भारतरत्न जाहीर केला आहे. २३ जानेवारीला कर्पुरी सिंह ठाकूर यांना भारतरत्न घोषित केला. त्यानंतर बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला. बिहारचे माजी मुख्यमंत्री असलेल्या कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला. यानंतर संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी महागठबंधन सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुख्यमंत्रिदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यानं पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर संयुक्त जनता दलाचे राज्यसभेचे खासदार आहेत.
चौधरी चरण सिंह, नरसिंह राव आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर,नरेंद्र मोदींची ट्विटद्वारे घोषणा
२२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर १२ दिवसांनी म्हणजेच ३ फेब्रुवारीला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर झाला. पाचवेळा लोकसभेचे आणि चारवेळा राज्यसभेचे खासदार राहिलेल्या अडवाणींनी राम मंदिरासाठी रथयात्रा काढली होती. २००२ ते २००४ या कालावधीत ते उपपंतप्रधान होते.

आता माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना आज भारतरत्न जाहीर झाला आहे. जुलै १९७९ ते जानेवारी १९८० या कालावधीत सिंह पंतप्रधान होते. त्याआधी ते दोनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले. एप्रिल १९६७ ते फेब्रुवारी १९६८ आणि फेब्रुवारी १९७० ते ऑक्टोबर १९७० या कालावधीत त्यांच्याकडे उत्तर प्रदेशचं नेतृत्त्व होतं. शेतकरी नेते अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे उत्तर प्रदेशातील शेतकरी पट्ट्यात भाजपला फायदा होऊ शकतो.

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. जून १९९१ ते मे १९९६ या कालावधीत त्यांच्याकडे पंतप्रधानपद होतं. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं श्रेय त्यांना जातं. त्यांनी आर्थिक उदारीकरणाची भूमिका घेतली. त्यामुळे भारतीय बाजारपेठ खुली झाली. याचा फायदा देशाला झाला. नरसिंह राव तेव्हाच्या हैदराबाद जिल्ह्यात झाला. आता हा भाग तेलंगणात झाला. राव यांना भारतरत्न जाहीर केल्याचा फायदा भाजपला दक्षिणेकडील राज्यांत होऊ शकतो.

हरित क्रांतीचे शिल्पकार एस. स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर झाला आहे. त्यांचा जन्म मद्रासमध्ये झाला होता. हरित क्रांती यशस्वी करण्यात आणि देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर केल्याचा फायदा दक्षिण भारतात भाजपला होऊ शकतो. दक्षिणेकडील राज्यांत भाजपचं फारसं वर्चस्व नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *