[ad_1]

गुरुबाळ माळी, कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदत्वाबाबत पुन्हा एकदा गैर मार्गाने सभासदांच्यावर अन्याय करून त्यांचा हक्क हिरावून घेण्याचा दुर्देवी प्रयत्न विरोधकांनी केलेला आहे. तो आम्हास व सभासदांना कदापीही मान्य नाही. आमदार सतेज पाटील यांना २१-० चा पराभव अजून पचला नाही, असे सांगताना सहसंचालकांनी घेतलेला निर्णय बेकायदेशीर असल्याने त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अंमल महाडिक यांनी दिली.

अमल महाडिक म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने या सभासदांना न्याय देऊन फेर तपासणीचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांना दिलेले होते. यामध्ये न्यायालयाने सभासदांना त्यांच्या विषयी काय तक्रार आहे व त्या सोबत कोणती कागदपत्रे जोडली आहेत आणि छाननी रिपोर्ट उपलब्ध करून देणे विषयी निर्देश दिले होते. तथापि यापैकी कोणतीही कागदपत्रे त्या सभासदांना उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. तसेच रितसर कागदपत्रे हजर करण्यास पुरेसा वेळ दिलेला नाही. त्यांचे रितसर म्हणणे आणि कागदपत्रांची कायदेशीर योग्य छाननी प्रादेशिक सहसंचालकांनी केलेली नाही. प्रादेशिक सहसंचालकांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे कोणतेही पालन न करता विरोधकांनी परस्पर दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे सदरचा बेकायदेशीर आदेश दिलेला आहे”.

निकालाला स्थगिती मिळविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही

प्रादेशिक सहसंचालकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन न करता दिलेल्या या आदेशाविरोधात त्यांच्या विरुध्द सभासदांच्याकडून आम्ही अवमान याचिका देखील दाखल करणार आहोत. तसेच यासाठी पुन्हा एकदा आम्ही या सभासदांना न्याय देण्यासाठी या निकाला विरोधात राज्य सरकारकडे अपिल करणार आहोत सदरचा प्रादेशिक सहसंचालकांचा आदेश हा सभासदांच्या आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या विरोधातील असून या निकालाला स्थगिती मिळविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही महाडिक यांनी सांगितले.

महाडिक गटाला मोठा धक्का: राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र, सतेज पाटलांच्या बाजूने निकाल
सतेज पाटलांचं वक्तव्य बालिशपणाचं

प्रादेशिक सहसंचालकांनी दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेली वक्तव्ये बालिशपणाची आहेत. प्रत्यक्षात या निकालाचा कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणूक निकालाशी कोणताही काडीचा संबंध नसताना कायदेशीर प्रक्रियेनुसार पार पडलेल्या निवडणुकीच्या संदर्भात करून ते सभासदांच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ म्हणजे फक्त राजकीय गट सांभाळणे एवढ्याच पुरता मर्यादित असून, त्यांच्या गटाच्या पराभूत उमेदवारांना मी काही तरी करून दाखवतोय आहे असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका अमल महाडिक यांनी केली.

१०५ आमदार असलेल्यांची परिस्थिती काय? त्यांच्या डोळ्यात फक्त… सतेज पाटलांनी डिवचलं
२१-० ने झालेला पराभव त्यांना पचत नाही

या निकालामध्ये मोठीमोठी आकडेवारी सांगून सभासदामध्ये निष्कारण चुकीची माहिती सांगण्याची उठाठेव ते करीत असून खूप मोठ्या संख्येने १८९९ सभासदांचा प्रश्न असल्याचे ते भासवत आहेत. प्रत्यक्षात यापैकी ५५८ सभासद पात्र ठरले आहेत आणि ३३९ भादोले येथील सभासद मतदानास यापूर्वीच कारखान्याने उगळले होते. उर्वरित पैकी १०७ सभासद मयत आहेत. २ सभासद शेअर्स रद व अन्य नावे वर्ग झालेले आहेत. ही संख्या विचारात घेता हा विषय ८२४ सभासदापुरताच संबंधित येतो. हे ८२४ सभासद सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने निवडणुकीच्या वेळी पात्रच होते. तरी देखील नुकत्याच झालेल्या निवडणूकीचा निकाल पाहता मी स्वतः सर्वाधिक २२०५ मतांनी व आमचे सत्तारूढ पॅनेलचे सर्व उमेदवार सरासरी १६०० मतांनी विजयी झालेले आहेत. हा फरक ८२४ पेक्षा निश्चितच मोठा आहे. त्यामुळे या सभासदांच्या जीवावर सत्ता मिळविली हे सतेज पाटलांचे वक्तव्य पोरकटपणाचे ठरते. खरे पाहता २१-० झालेला दारूण पराभव त्यांना चार महिने उलटले तरीही पचवता आलेला नाही, हेच सुर्यप्रकाशाइतके खरे सत्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

पराभव मोठ्या मनानं मान्य, आम्ही आत्मचिंतन करु | सतेज पाटील

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *