[ad_1]

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी केली. टीम इंडियाकडून बुमराहने दोन्ही डावात ९ विकेट घेतल्या. दुखापतीमुळे बुमराह काही काळ संघाबाहेर होता. त्यामुळे त्याची क्रिकेट कारकीर्द संपली असे अनेक क्रिकेट तज्ज्ञ मानू लागले. यामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या नावाचाही समावेश आहे. पण बुमराहने आपल्या तुफानी गोलंदाजीने सगळ्यांची बोलतीच बंद केली आहे.गेल्या वर्षी जुलैमध्ये बुमराहला दुखापत झाली होती, तेव्हा शोएब म्हणाला होता की बुमराह आता फार काळ टिकणार नाही. शोएबचा असा विश्वास होता की बुमराहची अॅक्शन फ्रंटऑन आहे. याचा अर्थ असा की जेव्हा बुमराह चेंडू टाकतो तेव्हा त्याचे शरीर पुढे येते. शोएब अख्तर म्हणाला होता की, ॲक्शन बॉलर्सच्या पाठीला एकदा दुखापत झाली की त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते पूर्वीसारखी गोलंदाजी करू शकत नाहीत, पण भारताच्या या वेगवान गोलंदाजाने ज्या प्रकारे पुनरागमन केले आहे त्यावरून शोएब अख्तरला चांगलेच उत्तर मिळाले असेल. बुमराहच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स इंग्लंडविरुद्धच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराहला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात बुमराहने एकापेक्षा एक असे चेंडू टाकले, ज्यामध्ये त्याने ऑली पोपला टाकलेला यॉर्कर बॉल अप्रतिम होता. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात बुमराहने कसोटीत सर्वाधिक १५० विकेट घेणारा भारताचा गोलंदाजही ठरला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *