[ad_1]

रत्नागिरी: एकनाथ शिंदे यांना आदल्या दिवशी मुख्यमंत्री पदाचा आमचा उमेदवार, असं जाहीर करून टाकलं. एका रात्रीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्री झालात. शिवसेनाप्रमुखांना मुख्यमंत्री कधी होता आलं नसतं का? ज्या मनोहर जोशींना बाळासाहेबांनी लोकसभेचा अध्यक्ष केलं, त्या शिवसेनाप्रमुखांना लोकसभेचे अध्यक्ष होता आलं नसतं का? पण या उद्धव ठाकरेंना सत्ता हवी. मुख्यमंत्रीपद हवे म्हणून पक्ष संपवला, अशी जहरी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
शरद पवार यांच्या मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का अजितदादा? जितेंद्र आव्हाड भडकले
ते पुढे म्हणाले की, प्रमोद नवलकरांचे फोनही हा माणूस घेत नव्हता. नवलकर यांच्या मुलीला जाऊन विचारून बघा. मी राजकारणातून उद्या निवृत्त होऊन जाईन, असं थेट आव्हानच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. ज्या वेळेला नवलकर साहेब गेले त्यावेळेला नवलकर साहेबांच्या मुलींना चालते व्हा म्हणून सांगितलं. आता कशाला इथे आलात, असा मोठा खळबळजनक किस्साच रामदास कदम यांनी जाहीर सभेत सांगितला. मनोहर जोशींसारख्या नेत्याला या माणसाने स्टेजवरून खाली उतरायला लावलं. अपमानित केलं. लीलाधर डाकेंना वर्षा बंगल्यावर तीन तीन तास बसवून ठेवलं. भेट दिली नाही. सुधीर जोशींची ही काय अवस्था केली हेच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. रामदास कदमला बाजूला करून टाकत स्वतःच्या मुलाला मंत्रीपद दिले. दिवाकर रावते यांचं मंत्रीपद आणि आमदारकी काढून घेतली. अशी सगळ्या नेत्यांची अवस्था उद्धव ठाकरे यांनी केली आहे, अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी दापोली पालगड येथे आयोजित एका कार्यक्रमात जाहीर सभेत बोलताना केली आहे.

मी लवकरच सगळा महाराष्ट्र फिरणार आहे. त्यावेळी मी बोलणार आहे, असा इशाराही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना याच उद्धव ठाकरेंनी संपवलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. त्यांना संपवण्याचं हे पाप उद्धव ठाकरे यांनी केलं, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की, काँग्रेससोबत जाण्याची मला वेळ आली तर तर मी माझं शिवसेना नावाचे दुकान बंद करून टाकीन, अशी शपथ शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी घेतली होती. आता हे उद्धव ठाकरे सोनिया गांधींबरोबर जात शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसत आहेत. इतरांना गद्दार म्हणत आहेत. अरे तुमची औकात काय? अशी बोचरी टीका शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे.

सरकारची सुपारी घेऊन बोलणं तुमच्यासारख्यांना शोभत नाही, मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंवर पलटवार

रामदास कदम म्हणाले की, सर्वसामान्य मराठी माणसासाठी झगडणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेला १९६६ साली जन्म दिला. त्यांनी स्वतःला कोणतेही पद कधी घेतलं नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य महत्व देण्याचे काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं असं सांगत उद्धव ठाकरे तुम्ही काय केलंत, असा सवाल रामदास कदम यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यावर ही कदम यांनी टीका केली. रायगड हा निष्ठावंतांचा आहे. तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले रायगड आहे. तुमच्यासारख्या बेईमान्यांचं काम या रायगडमध्ये नाही, अशा शब्दात ठाकरे यांचा समाचार घेतला. अडीच वर्षे तुम्ही मुख्यमंत्री होतात. काय केलं, असाच सवाल करत कोकणात मोठे फयान वादळ आलं. समुद्र किनाऱ्यावरील सगळं नेस्तनाबूत बेचिराख झालं होतं. मच्छीमार बांधव संकटात सापडले होते. तेव्हाही हा माणूस आला नाही, पण ८२ वर्षाचे शरद पवार तीन दिवस कोकणात येऊन बसले होते. जनतेचे अश्रू पुसण्यासाठी या उद्धव ठाकरेंचा पोरगं जे टुणुक टुणुक चालत आलं होतं का, असा उद्विग्न सवाल रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *