[ad_1]

नवी दिल्ली : देशातील सर्वात जुनी, सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित बँक – भारतीय स्टेट बँकेच्या (आरबीआय) माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी एक प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून सुरुवात केली आणि भारतातील सर्वात प्रभावशाली व्यावसायिक महिला होण्यापर्यंतचा उल्लेखनीय प्रवास पूर्ण केला. कॉर्पोरेट जगत आणि अपारंपरिक क्षेत्रात यशाचा नवा अध्याय लिहिणाऱ्या अरुंधती या २०० वर्षहुन अधिक जुन्या एसबीआयच्या पहिल्या आणि सर्वात तरुण महिला अध्यक्षा आहेत. विशेष म्हणजे बँकेची नोकरी अरुंधतीच्या आवडीचा विषय कधीच नव्हता. प्रत्येक चांगल्या कामाला आवश्यक वेळ लागतो, शॉर्टकट कोणत्याही समस्येचा उपाय नाही असे त्यांचे मत आहे.

देशातील कोट्यवधी ग्राहकांना बँकिंग सेवा देणाऱ्या एसबीआयच्या पहिल्या महिला अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांना कदाचित हे भाग्य लाभले नसते. बेरोजगारी आणि दैनंदिन गरजा भागवण्याच्या धडपडीमुळे वडिलांनी तिसऱ्या अपत्याचा विचार सोडून दिला होता. अरुंधती भट्टाचार्य यांची आई गरोदर असताना वडिलांनी अनेकदा गर्भपात करण्याचा विचार केला, पण जन्मलेले मूल स्वतःचे नशीब घेऊन येते आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती बदलू शकते, असा अरुंधती भट्टाचार्य यांच्या आईचा विश्वास होता.

Success Story : वय १३ वर्ष अन् महिन्याचा पगार २ कोटी; वडिलांच्या थकव्याने सुचली आयडिया; वाचा टिळक मेहता यांची यशोगाथा
कोण आहेत अरुंधती भट्टाचार्य
अरुंधतीची शैक्षणिक कामगिरी इयत्ता पाचवीपर्यंत सामान्य होती. त्यांनी बोकारो स्टील सिटी येथील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कलकत्ता येथील लेडी ब्रेबॉर्न कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्यात आपले शिक्षण घेतले. तिथे असताना अरुंधतीला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठीच्या प्रवेश परीक्षांची माहिती मिळाली. इंग्रजी साहित्य शिकत असताना काही मैत्रिणींच्या सांगण्यावरून त्यांनी बँक PO परीक्षेला बसण्यासही होकार दिला आणि तब्बल तीन दशकानंतर परिणाम आपल्या सर्वांसमोर आहे. पुरुषांचे वर्चस्व असलेले क्षेत्र असूनही त्यांनी कठोर परिश्रम, समर्पण आणि अपवादात्मक नेतृत्व कौशल्याद्वारे परीक्षा पास केली.

एका मेसेजने सुन्न झाल्या इंदिरा गांधी, रातोरात बदलले नियम, भेटा औषध उद्योगातील रॉबिनहूडला
इतिहास घडवला
२०१३ मध्ये भट्टाचार्य यांनी २०० हुन अधिक जुन्या एसबीआयचे नेतृत्व करणारी पहिली महिला बनून इतिहास घडवला. त्यांच्या नेतृत्वात एसबीआयने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, ग्राहकांचे अनुभव सुधारणे आणि बुडीत कर्जाच्या समस्येचे निराकरण करणे यासह महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. बँकिंग क्षेत्रातील आव्हानांना सहजतेने सामोरे गेल्या आणि सुधारणांद्वारे एसबीआयचे नेतृत्व करत भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून स्थान मजबूत केले. आधुनिक धोरणांसह पारंपारिक बँकिंग पद्धतींचा समतोल साधण्याच्या क्षमतेमुळे त्यांना व्यापक मान्यता मिळाली.

कधी खिशात २५ पैसे नव्हते, उपाशी पोटी झोपले; कष्टाचं चीज करून जमवली ५०० कोटींची संपत्ती
SBI मधील भट्टाचार्य यांचा कार्यकाळ आर्थिक समावेशन आणि सामाजिक उत्तरदायित्वासाठी त्यांच्या वचनबद्धतेने चिन्हांकित होता. तंत्रज्ञान आणि बँकिंग सेवांद्वारे ग्रामीण भारताचा कायापालट करण्याचा उद्देश असलेल्या “एसबीआय डिजिटल व्हिलेज” प्रकल्पासारख्या उपक्रमांना त्यांनी यशस्वी बनवले. अरुंधती भट्टाचार्य यांचा प्रवास दृढनिश्चय, नेतृत्व आणि लैंगिक अडथळे तोडण्याच्या शक्तीचे उदाहरण देतो. त्यांच्या यशाची कहाणी पुरुषप्रधान क्षेत्रात यशस्वी होण्याच्या आकांक्षा असलेल्या अनेक महिलांसाठी प्रेरणा आहे आणि मोठ्या संस्थांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी नैतिक नेतृत्व व नवकल्पना यांच्या प्रभावावर प्रकाश टाकते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *