[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले माजी खासदार संभाजीराजे यांनी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे, याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुंबईत काही नेत्यांशी चर्चा केली असून पक्षात प्रवेश केल्यास उमेदवारी देण्याचा शब्द त्यांना मिळाल्याचे समजते.

कोल्हापूर मतदार संघावर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी दावा केला आहे. ज्याच्याकडे सक्षम उमेदवार त्याला जागा हे धोरण काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गटाने घेतली आहे. सध्या या तीनही पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्याने तशा उमेदवाराचा शोध सुरू आहे. श्रीमंत शाहू महाराज यांनी नकार दिल्यानंतर सध्या संभाजीराजे यांच्याबाबत हालचाली सुरू आहेत.

स्वराज्य संघटनेचा महाविकास आघाडीत समावेश करून आघाडीची उमेदवारी घेण्याचा संभाजीराजेंचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्ह्णून त्यांनी आघाडीच्या काही नेत्यांच्या भेटी घेतल्या. पक्षात प्रवेश करा मगच उमेदवारीचा विचार करू असा शब्द काँग्रेससह इतर पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांना दिल्याचे समजते. यामुळे स्वराज्य संघटना आघाडीत विलीन करावे लागणार आहे. पक्ष प्रवेश केल्यास संघटनेचे अस्तित्व संपणार आहे. यामुळे संभाजीराजे कोणती भूमिका घेणार याची आता उत्सुकता आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यास राज्यसभेला उमेदवारी देऊ असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दीड वर्षापूर्वी सांगितले होते. पण, तेव्हा संभाजीराजेंनी नकार दिला. यामुळे राज्यसभेची संधी हुकली. आता पुन्हा उमेदवारीसाठी तशीच अट घालण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटापेक्षा काँग्रेसची ताकद अधिक आहे. यामुळे ते या पक्षाला प्राधान्य देण्याची शक्यता जास्त आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *