[ad_1]

मुंबई/धाराशिव : परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सोडल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धाराशिव अर्थात उस्मानाबाद लोकसभेची जागा शिवसेना-भाजपकडून मिळण्याची शक्यता आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील ‘घड्याळ’ चिन्हावरुन मैदानात उतरणार असल्याचं निश्चित झालं आहे. आज दुपारी तीन वाजता अर्चना पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, लातूरचे आमदार अभिमन्यू पवार यांची चर्चा झाली. त्यानुसार अर्चना पाटील आज दुपारी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत. पक्षप्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

कोण आहेत अर्चना पाटील?

अर्चना पाटील यापूर्वी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपसभापती होत्या, मात्र सध्या त्या कोणतेही पद सांभाळत नाहीत. लोकसभेच्या माध्यमातून त्या पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
किरणभैयांची भावनेच्या भरात ‘माघार’ पोस्ट, समजुतीनंतर डिलीट; रत्नागिरीवर शिवसेनेचा दावा काय, उदय सामंत ठाम
राणा जगजितसिंह यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती. शिवसेनेच्या (आता ठाकरे गट) ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात राणा मैदानात उतरले होते. मात्र ओमराजेंनी त्यांना पराभवाची धूळ चारली होती.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी फायनल, ज्योती मेटे ‘सिल्व्हर ओक’ला, पाच संभाव्य उमेदवार कोण?

राष्ट्रवादी ते भाजपात

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राणा जगजितसिंह यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाले. याआधी २००४ ते २००८ आणि २००८ ते २०१४ या काळात दोन वेळा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत.

आजपर्यंत कुणाला खासदारकी नको होती, दिल्लीला जायचं नव्हतं; सुप्रिया सुळेंचा अजित दादांना टोला

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिले आहे. आता राणांची पत्नी त्याच मतदारसंघातून ओमराजेंविरोधातच मैदानात उतरली, तर पतीच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी त्यांना असेल.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

राणा जगजितसिंह आणि निंबाळकर यांच्यात कौटुंबिक वैर आहे, निंबाळकरांच्या वडिलांचा राणा जगजितसिंह यांच्या वडिलांनी खून केल्याचा आरोप आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *