[ad_1]
देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, लातूरचे आमदार अभिमन्यू पवार यांची चर्चा झाली. त्यानुसार अर्चना पाटील आज दुपारी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत. पक्षप्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
कोण आहेत अर्चना पाटील?
अर्चना पाटील यापूर्वी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपसभापती होत्या, मात्र सध्या त्या कोणतेही पद सांभाळत नाहीत. लोकसभेच्या माध्यमातून त्या पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राणा जगजितसिंह यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती. शिवसेनेच्या (आता ठाकरे गट) ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात राणा मैदानात उतरले होते. मात्र ओमराजेंनी त्यांना पराभवाची धूळ चारली होती.
राष्ट्रवादी ते भाजपात
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राणा जगजितसिंह यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाले. याआधी २००४ ते २००८ आणि २००८ ते २०१४ या काळात दोन वेळा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिले आहे. आता राणांची पत्नी त्याच मतदारसंघातून ओमराजेंविरोधातच मैदानात उतरली, तर पतीच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी त्यांना असेल.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
राणा जगजितसिंह आणि निंबाळकर यांच्यात कौटुंबिक वैर आहे, निंबाळकरांच्या वडिलांचा राणा जगजितसिंह यांच्या वडिलांनी खून केल्याचा आरोप आहे.
[ad_2]
Source link