[ad_1]

किरण मानेंची फेसबुक पोस्ट

किरण मानेंची फेसबुक पोस्ट

किरण मानेंनी ही पोस्ट करताना सुरुवातीला असं लिहिलं की- ‘नार बघून तरणी, मवाली पिळतूय मिशिला… खून करून सुटाया, सैतान लावतोय वशिला… आरं भोंदू झाला बिरस्पती आन् साधू झालाय खुळा, खोटं काय म्हन्ता राव – आंधळा मारतोय डोळा! आजच्या परिस्थितीवरचं भाष्य वाटावं असं परखड सत्य आपल्या गान्यांमधून सांगनार्‍या दादांना ‘अश्लील’ म्हणून का हिनवलं गेलं हे मला आजपर्यंत कळलेलं नाय दोस्तांनो! स्पष्टच बोलू का? दादा कोंडके म्हन्लं की ज्यांना फक्त ‘डबल मिनिंग’चे संवाद आठवत्यात त्यांना दादा कळलेच न्हाईत! श्रेष्ठ कलावंत तोच असतो भावांनो, जो मनोरंजन करता-करता समाजाच्या खर्‍या वेदनांना वाचा फोडतो… जनजागृतीची, समाजसुधारणेची जबाबदारी खांद्यावर घेतो. जातीधर्मापलीकडची ‘मानवता’ जपतो. त्या कलाकारालाच सर्वसामान्य प्रेक्षक मनापास्नं भरभरून प्रेम देतात, जसं दादांना दिलं!’

आज असा कलावंत नाही

आज असा कलावंत नाही

शेवटी किरण माने असं लिहितात की, ‘दादा, तुमच्यासारखा एकीकडे खळखळून हसवत, दूसरीकडं अतिशय अभ्यासपूर्वक, समाजातल्या विसंगतीवर बोट ठेवून, उघडंनागडं ‘सत्य’ बोलनारा एकही कलावंत आज आमच्या अवतीभवती दिसत नाही. अभिनेत्याकडं समाजभानातनं आलेली निर्भिडता आणि विद्रोह या गोष्टी अंगी असणं हे अत्यंत गरजेचं आहे, हेच बहुसंख्य कलाकारांना माहिती नाही. ‘तुमचं आमचं जमलं’ सिनेमात तुम्ही तुमच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याला विचारता, ‘खोटं बोलूनी पोट भरतया म्हनून का रं जगायचं? माल कुनाचा कोन खातुया, किती दिस हे बघायचं?’ असो… ‘गेली सांगून द्यानेसरी… मानसापरास मेंढरं बरी!’ हेच खरं. मिस यु दादा. लब्यू लैच- किरण माने.’

दादांनी राजकीय परिस्थितीवर केलं भाष्य

दादांनी राजकीय परिस्थितीवर केलं भाष्य

दादांनी सिनेमातून केलेल्या राजकीय परिस्थितीवरील भाष्याविषयी किरण लिहितात की, ‘दादांनी आपल्या पिच्चरमधनं बिनधास्तपने सामाजिक-राजकीय भाष्य केलं. त्या काळातल्या इंदिरा गांधी-संजय गांधींच्या धोरनांवर, आनीबानीमधल्या अराजकावर सडकून आन् बेधडक टीका केली. ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकाला समोर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या राजकीय नेत्यांना चिमटे काढायला दादा मागंपुढं बघत नव्हते! अर्थात शिवसेनेवरच्या प्रेमापोटी इलेक्शनच्या काळात त्यांनी काही सवंग भाषणंही केली, पण तिकडे दुर्लक्ष करावं असा मजबूत कन्टेन्ट त्यांनी सिनेमातून दिलाय.’

हिंदू-मुस्लीम एकता

हिंदू-मुस्लीम एकता

सामाजिक विषयांवर आपल्या सिनेमांमधून प्रकाश टाकण्यात दादा अग्रेसर होते, हे सांगण्यासाठी मानेंनी एका सिनेमाचे उदाहरण दिले आहे. ते म्हणतात की- ‘हिंदू-मुस्लीम एकतेवर तर दादा पिच्चरमधनं भरभरून बोललेत. ‘राम राम गंगाराम’मधला म्हमद्या खाटीक आनि गंगारामची मैत्री ही नुस्ती मनोरंजनासाठी नव्हती, त्यात सामाजिक संदेशबी व्हता! मटनाच्या दुकानात भगवान शंकराच्या फोटोपुढं नमाज पडणारा म्हमद्या. ते पाहून ‘भावना दुखावून’ चिडनारे (मटन आनायला आलेले) गुरूजी. हे समदं लै लै लै खोल व्हतं भावांनो! एका प्रसंगात म्हमद्या खाटीक म्हन्तो, ‘साला तुम लोगने वो तुकारामको उपर पाठव्या, तुमने साला वो मिराबाईको जहर पिलाया, संत ज्ञानेश्वरको तुम लोगोंने गाड दिया, तुम लोग सिर्फ डाकू लोगकोच पसंद करता हय’

दादा माणूस

दादा माणूस

या फेसबुक पोस्टमधून किरण यांनी दादांच्या सिनेमातील आणखी एक प्रसंग सांगितला- ‘ह्योच नवरा पायजे सिनेमामधला ‘गॉड इज वन, पन नेम्स आर अनेक’, असं म्हनत गळ्यात फादरनं दिलेला क्रॉस घालनारे आनि दंडात चाँदभाईनं दिलेला ताईत बांधनारे दादा ज्याला कळले, तो दादांना कधीच ‘फक्त’ डबल मिनिंगमध्ये अडकवून चीप करनार नाय! याच सिनेमातला एक प्रसंग तर लै लै लै खतरनाक हाय. ‘जॉन बेकरी’ मध्ये गेलेल्या दादा कोंडकेंना, तिथं पाव आणायला आलेला एक म्हातारा अडवतो आणि म्हणतो, ‘काय रे शिंच्याS? हिंदू असुन गळ्यात क्रॉस घातलायंस? एकादशीच्या मुहूर्तावर खिश्चन झालास की काSय?’ त्यावर दादा त्याला सुनावतात, ‘तुम्ही काय केलंय हो धर्मासाठी? हा बेकरीवाला जनू कांबळे, हरीजन म्हनून तुम्ही वाळीत टाकला. अस्पृश्य म्हनून हिनवला. गावाबाहेर काढला. त्या फादरनं त्याला जवळ केला. जनू कांबळेचा ‘जॉन कॅंबल’ केला आणि त्याला बेकरी टाकून दिली. आता त्या बेकरीतून तुम्ही पाव विकत घेताय. तुमाला लाज वाटत नाय? यू बेशरम, तुला जोड्यानंच मारला पायजे.’ खाडदिशी त्याच्या मुस्काडात देनारे दादा आनि घाबरून गळून जानारा तो म्हातारा, त्यावर कळस म्हन्जे त्याच्याकडे पाहून आजूबाजूच्या लोकांना ‘उचलून घेऊन जा रे याला. मी असल्याला हात लावत नसतो’, ‘यातलं बिटवीन द लाईन्स’ कळायला मेंदू लै तल्लख लागतो माझ्या सोन्या. दादा ह्यो ‘दादा’ मानूस व्हता!’

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *