[ad_1]

ठाणे : मुंबई-ठाण्यात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दहीहंडीसाठी शिवसेना, भाजप, मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अशा सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आयोजित वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली.

वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने सुरुवातीला नऊ थर लावण्याचा केलेला पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. परंतु पहिल्या वेळी आलेल्या अपयशानंतर गोविंदा पेटून उठले. दुसऱ्याच झटक्यात जय जवान गोविंदा पथकाकडून नऊ थरांची यशस्वी सलामी देण्यात आली. जय जवान गोविंदा पथकाने तीन एक्क्यांचे थर लावले. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने ठाण्यातील वर्तकनगर येथे संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात २०१२ मध्ये जय जवान गोविंदा पथकाने नऊ थर रचून विश्वविक्रम केला होता. गुरुवारी सकाळी ठाण्यात दाखल झालेल्या या गोविंदा पथकाने सर्वप्रथम संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात नऊ थर रचण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात याच ठिकाणी पथकाने नऊ थरांची यशस्वी सलामी दिली. यावेळी उपस्थितांनी श्वास रोखून धरले होते. जय जवान गोविंदा पथकाने शिस्तबद्ध सलामी दिल्यानंतर उत्सवाचे आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, यंदा मुंबईत जवळपास १७ हजार ते १८ हजार दहीहंड्या उभारल्या जाणार असल्याचे चित्र आहे. या दहीहंड्या फोडण्यासाठी केवळ मुंबईत सुमारे ९०० गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. साधारणपणे आठ थरांची दहीहंडी उभारणारे गोविंदा पथक घराबाहेर पडल्यावर गाडी, गोविंदांचे दिवसभराचे जेवण, त्यांना लागणारे टी शर्ट आणि अन्य गोष्टींचा खर्च अडीच ते तीन लाख रुपयांवर जातो. दरवर्षी हा खर्च भागविण्यासाठी गोविंदा पथकांना मदत गोळा करावी लागते. अनेकदा राजकीय नेत्यांकडे स्वतःहून जाऊन मदत मिळवावी लागते.

Mumbai Dahi Handi: गोविंदा चाखणार लाखोंचे लोणी, आजच्या दहीहंडीत गोविंदांना मिळणार विक्रमी मलई
निवडणुका जवळ आल्याने यंदा राजकीय पक्षांनी ही संधी हेरली आहे. राजकीय पक्ष स्वतःहून गोविंदा पथकांकडे जाऊन त्यांना आर्थिक मदत देऊ करत आहेत. त्यातून पथकांची खर्चाची चिंता मिटली आहे. त्यातच यंदा गोविंदा पथकांना बक्षिसांचीही मोठी कमाई होणार आहे. अनेक मंडळांनी सहा थरांसाठी ७ हजार रुपये, सात थरांना १५ हजार रुपये, तर आठ थरांसाठी २५ ते ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. नऊ आणि दहा थर लावणाऱ्या मंडळांना काही लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत, अशी माहिती दहीहंडी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

थरांवर थर रचत विठ्ठल-रुक्मिणीच्या सुरेख रुपाचं दर्शन

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *