[ad_1]
ही रील करत त्याची अविनाश त्यांचे खूप चांगले मित्र असल्याचं लिहिलं आहे. जेव्हा तुमचा नवराच तुमचा मित्र असतो तेव्हा असं कॅप्शन दिलं आहे. ऐश्वर्या यांनी पोस्ट करत लिहिलं, ‘आता २५ हून अधिक वर्ष झाली. त्याने मला कायम पाठिंबा दिला. ज्या गोष्टी मी करू शकेन की नाही याची मलाच खात्री नव्हती अशा गोष्टी करायला त्याने मला प्रोत्साहन दिलं. मला स्वतःचा शोध घ्यायला मदत केली. काही बाबतीत आमची मतं वेगळी असली तरी प्रत्येक क्षण आम्ही एन्जॉय करतो. यालाच आनंदी आयुष्य म्हणतात. मला माहितीये की एक मित्र म्हणून तू नेहमी माझ्यासोबत होतास आणि आहेस आणि यापुढेही असशील. न संपणारी मैत्री…’ त्यांच्या पोस्टवरून त्यांचं नातं अजूनही किती घट्ट आणि चिरतरुण आहे याचा अंदाज येतो.
ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत दिसत आहेत. त्या मालिकेत रुपालीची नकारात्मक भूमिका करत आहेत. त्यांचं हे पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
[ad_2]
Source link