[ad_1]
रविवारी जदयूच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला ४ आमदार गैरहजर होते. बीमा भारती, सुदर्शन, दिलीप राय आणि रिंकू सिंह बैठकीला आले नाहीत. यापैकी रिंकू सिंह वगळता सर्वांचे फोन बंद होते. याशिवा डॉ. संजीव देखील बैठकीला नव्हते.
हम पक्षाचे नेते जीतनराम मांझी यांना राज्यसभा खासदारकीची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही. मांझी यांनी किमान दोन मंत्रिपदं मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या पक्षाला एकच मंत्रिपद मिळालेलं आहे. मांझी यांचा रात्री १० वाजता फोन बंद झाल्याची देखील बातमी समोर आली आहे. यानंतर भाजप नेते नित्यानंद राय मांझी यांच्या घरी गेले होते.
राजदनं विश्वासदर्शक ठरावापूर्वी खेळ होईल असं म्हटलं. तर, काँग्रेसनं नितीशकुमार यांचं सरकार कोसळेल असं म्हटलं. दुसरीकडे सूत्रांच्या माहितीनुसार जेडीयूचे ५ आणि भाजपचे ३ आमदार संपर्काबाहेर आहेत. मात्र, काँग्रेसच्या दाव्यानुसार भाजपचे ४ आणि जदयूचे ९ आमदार गायब आहेत.
तेजस्वी यादव यांच्या घरी दोनदा पोलिसांची धडक
राजदचे प्रमुख नेते तेजस्वी यादव यांच्या घरी रात्री दोनवेळा पोलिसांनी धडक दिली. राजद आमदार चेतन आनंद यांच्याबद्दल तक्रार असल्यानं पोलीस दाखल झाले होते. चेतन आनंद यांनी संवाद साधल्यानंतर पोलीस निघून गेले. पुन्हा एकदा पोलीस तेजस्वी यादव यांच्या घरी पोहोचले होते.
Read Latest Maharashtra News And Marathi News
बिहारमधील राजकीय बलाबल
एनडीए : १२८
भाजप: ७८
जदयू : ४५
हम : ४
अपक्ष :१
महागठबंधन :११४
राजद :७९
काँग्रेस :१९
सीपीआय एम एल :१२
सीपीआय सीपीएम :४
[ad_2]
Source link