[ad_1]

अकोला : अकोला जिल्ह्यात १९ वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडिता काजल (बदलेलं नाव) हिच्यावर हत्येच्या अगोदर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालात समोर आलं आहे. त्यानुसार या प्रकरणातील आरोपीविरोधातील कलमांमध्ये वाढ करून त्यामध्ये ३०२सह ३७६, ३७७ कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. काजल ही २७ जुलैपासून बेपत्ता होती आणि २९ जुलै रोजी तिचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पातुर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं होतं. या हत्येनंतर अकोला जिल्ह्यात निदर्शने सुरू झाली. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत होती. तसंच काजलची हत्या पातुर पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला होता.

तरुणी बेपत्ता असताना पोलिसांकडून कुटुंबियांना सहकार्य मिळालं नाही, याअगोदर तीन वेळा आरोपीविरुद्ध तक्रार करूनही पोलिसांनी गांभीर्यांनं दखल घेतली नाही, त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणानं काजलचा बळी गेला, असाही आरोप करण्यात आला होता.

बॅटने काच फोडली, अंधेरीचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवकरांच्या गाडीवर हल्ला

नेमकं काय होतं प्रकरण?

काजल ही २७ जुलै रोजी रात्री शौचालयास जाते म्हणून घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. अखेर कुटुंबीयांनी ती बेपत्ता असलेली तक्रार पातुर पोलिसात दाखल केली. पातुर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. परंतु २९ जुलै रोजी पातूर येथील सुमित्राबाई अंधारे कृषी विद्यालयाजवळील शेत शिवारात जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका काटेरी झुडपात काजलचा मृतदेह सापडला.

काजलचा हात आणि गळा ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. आधी गळा आवळला आणि नंतर तिचे हात बांधून ठेवले, असं प्राथिमक वैद्यकीय अहवालात समोर आलं होतं. काजलच्या हत्येनंतर जिल्हाभरात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. ठिकठिकाणी सामाजिक संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात होता. तपासादरम्यान पातुर पोलिसांना गावातीलच गजानन बळकर याचे काजलच्या कुटुंबीयांसोबत वाद असल्याचे समोर आले. मग पोलिसांना गजाननवर संशय असल्याने त्याला ताब्यात घेतले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *