[ad_1]
विशाखाट्टणम: युवा फलंदाज आणि सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या नाबाद १७९ धावांच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ६ बाद ३३६ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी आणि आर अश्विन खेळत होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे आज शुक्रवारपासून सुरू झाली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
[ad_2]
Source link