[ad_1]

म.टा प्रतिनिधी, अहमदनगर: भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांना पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जिन्ना यांच्या कबरीवर फुले वाहायला गेले या प्रकरणातून आरएसएस व भाजपाने त्यांना दोष मुक्त केले आहे का? दोष मुक्त न करता त्यांना भारतरत्न दिला हा मोठा फ्रास् आहे अशी टीका बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज नगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. महाविकास आघाडीच्या संदर्भात आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम जो काही आहे तो ठरल्यानंतर पुढचा विषय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. बीड या ठिकाणी कार्यक्रमाहून आले असता येथे शासकीय विश्रामगृहावर ते बोलत होते.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की केंद्र सरकारने लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिल हे आम्ही ऐकलं आहे, तुम्ही अडवाणींना तर भारतरत्न दिला तर मग पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष जिन्हा यांच्या कबरीवर त्यांनी फुले वाहिले म्हणून तुम्ही त्यांना पदापासून दूर केलं. मग आता आरएसएस व भाजप यांनी त्यांना त्याच्यातून दोष मुक्त केले का असा सवाल करत दोष मुक्त न करता त्यांना भारतरत्न दिला हा मोठा फ्रास् आहे असे ते म्हणाले.

Maratha Survey: मुंबईतील मराठा सर्वेक्षण पूर्ण, साडेतीन लाख घरांचा सर्वेक्षणास नकार

आंबेडकर म्हणाले, उल्हासनगर या ठिकाणी भाजप आमदाराने केलेल्या गोळीबार पाहता त्यांना दुपारपर्यंत अटक झाली नव्हती. गृहमंत्री यांच्या समवेत एका कार्यक्रमांमध्ये आम्ही यावर चर्चा केली व त्यांनी आम्ही चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगितले असे आंबेडकर यांनी सांगितले. गोळीबार प्रकरणावरून शासन अपयशी आहे असे विचारल्यानंतर त्यांनी सपशेल शासन अपयशी आहे कारण शासनाबरोबर जे आमदार आहेत त्या आमदारांना जे काही पाहिजे आहे ते देत आहे त्यामुळे ते शासनाला जसे पाहिजे तसे झुकवतात असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आंबेडकर म्हणाले आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो सध्या अर्धवट अवस्थेमध्ये आहोत यामध्ये अन्य घटक पक्ष सुद्धा आहेत, आम्ही काल एकत्रितपणे चर्चा केलेली आहे. ती करत असताना आम्ही काही बाबींवर चर्चा करताना जे जे पक्ष आहेत त्या पक्षांनी मराठा आरक्षण, ओबीसींचा प्रश्न, शेतीच्या संदर्भातील आंदोलन, यावरती प्रत्येक पक्षाची नेमकी काय भूमिका आहे, त्या संदर्भातला एक मसुदा तयार केला पाहिजे. या नंतर आपण इतर विषय घेऊन कॉमन मिनिमम प्रोग्राम हा घेतला पाहिजे व तो घेतल्यानंतर प्रत्येक पक्षाची नेमकी काय काय भूमिका येते हे कळल्यानंतर पुढील वाटचाल करणे हे अधिक सोपे जाईल असे काल झालेल्या चर्चेमध्ये मी भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण 25 मुद्द्याचा मसुदा म्हणजेच कॉमन मिनिमम प्रोग्राम हा तयार होऊ शकतो तो तयार झाल्यानंतर प्रत्येक पक्षातील दोन प्रतिनिधी नेमले जावे व त्यानंतर त्यांनी चर्चा केल्यावर नेमके किती मुद्दे एकत्र येतात व किती मुद्दे बाजूला पडतात हे समिती समोर आल्यानंतर आपल्याला निर्णय घेता येईल व त्यानंतर आपल्याला जागेच्या संदर्भातील चर्चा ही करावी लागेल म्हणजेच मिनिमम प्रोग्राम म्हणजेच समझोता हा झाला की पुढचे प्रश्न लगेच सुटतील असे ते म्हणाले. महाविकास आघाडी ही सध्या एकत्र राहत आहे उद्याचे सांगता येत नाही, मात्र मोदी व्यतिरिक्त कार्यक्रम सुद्धा घेणार आहोत त्यामुळे त्यांचे माझ्याबरोबर जुळवायचे दिसते असेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, समन्स टाळत असल्याने ‘ईडी’ची कारवाई; कोर्टात केली तक्रार

मराठा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये विचारल्यानंतर आंबेडकर यांनी आता ओबीसींनी एकत्रितपणे येऊन त्यांनाच मतदान करावे असे सांगितले आहे त्यामुळे आता दोन्ही समाजामध्ये दरी पडलेली आहे, हे नाकारता येत नाही निजामी मराठा व दलित वर्गाचे 70 वर्षांपूर्वी शोषण करण्यात आले होते ,सत्ताही नेहमीच निजामी मराठा म्हणजेच श्रीमंत मराठ्यांकडे राहिलेली आहे व त्यांनीच सत्ता व संपत्ती वाढवली असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे, व जो गरीब आहे तो गरीबच राहिला आहे असेही ते म्हणाले. याचे उदाहरण द्यायचे झाले तर शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे असे आपण म्हणतो पण केंद्राने कधीच हमीभावाचा कायदा केला नाही त्यामुळे शेतकरी वर्गाला त्याचा मोठा तोटा झाला असे ते म्हणाले. म्हणून मराठा समाजातील राज्यकर्त्यांनी व समाजाने मानवता भूमिका ही जपली पाहिजे स्वतःच्या फायद्यासाठी समाजातील तेढ व वस्तुस्थिती न मानणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे असे आपल्याला वाटते असे ते म्हणाले.

देशात इंडिया आघाडी राहिली नाही, ती परिस्थिती महाराष्ट्रात होऊ नये, म्हणून आमचा प्रयत्न असणार : प्रकाश आंबडेकर

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *