[ad_1]

शिरूर: आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यात अनेकांना आपले जीव देखील गमावावा लागतो. मात्र शिरूर तालुक्यातील डॉक्टरांनी धनुर्वातासारख्या आजाराने १९ दिवस व्हेंटिलेटर असणाऱ्या रुग्णाला अथक प्रयत्नानंतर वाचवण्यात यश आले आहे. अत्याधुनिक उपचारामुळे हे करणे शक्य झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सोमा टोपोनो (२३) असं रुग्णाचं नाव असून तो धनुर्वात या आजाराने ग्रस्त होता. त्यामुळे त्याला शिरूर येथील श्री गणेशा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कॅम्पस इंटरव्ह्यूमधून नोकरी; मात्र समाजासाठी कामं करण्याची इच्छा, कठोर संघर्षातून लेकीची उपजिल्हाधिकारी पदी निवड
रुग्णाला गंभीर अवस्थेत जानेवारी रोजी श्री गणेशा हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी नेमके या रुग्णाला काय झाले याचे निदान होत नव्हते. या आजाराने रुग्णाचे शरीर ताठरलेले अवस्थेत, कमरेखाली प्रचंड वेदना, तोंड उघडत नव्हते, परिणामी बोलता येत नव्हते. तसेच श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे अशी गंभीर स्वरूपात लक्षणे असताना रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र निदान होत नव्हते. यावेळी डॉक्टरांनी सर्व आवश्यक तपासण्या केल्या त्यानंतर रुग्णास धनुर्वात (tetanus) मधील दुर्धर आजाराचे निदान झाले. या आजारामुळे संबधित रुग्ण हा सलग १९ दिवस व्हेंटिलेटरवर उपचार घेत होता. जगेल की नाही याची शास्वती नव्हती.

मात्र, प्रगत अत्याधुनिक उपचार तसेच डॉक्टरांनी घेतलेले अथक परिश्रम यामुळे असाध्य आजारावर रुग्णाला योग्य उपचार देत तब्बल १९ दिवस व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णाला वाचवण्यात डॉक्टरांना वाचवण्यात यश आले आहे. याविषयी माहिती देताना डॉ. अखिलेश राजुरकर आणि संचालक डॉ. विशाल महाजन यांनी सांगितले की, वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित होत असताना संपूर्ण करिअरमध्ये अशा प्रकारचा रुग्ण प्रथम पहावयास मिळाला आहे. त्यावर अचूक निदान योग्य उपचार दिल्याने दुर्मिळ आजारावर इलाज करता आला आहे.

Mangesh Chivte Meet Manoj Jarange | मनोज जरांगे आणि मंगेश चिवटे यांची भेट, ४ ते ५ तास बंद दाराआड चर्चा!

यासाठी हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे तज्ञ डॉ. सारंग पाठक, डॉ. सौरभ पाठक, डॉ. सागर केदारे, डॉ. अक्षय काळे, डॉ. संतोष पठारे, डॉ. अभय घोडेकर, डॉ. सुमित रोकडे, डॉ. शुभम घोडे, फिजिओथेरपिस्ट डॉ. पूनम केंदळे, सुरज खरात, शिल्पा झंजाड, शुभांगी गावडे, मोनिका गायकवाड, प्रेतीना मोची, आशिकेश शेळके, शीतल पोकळे, वैशाली पडवळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

काय आहे धनुर्वात आजार?
धनुर्वात हा आजार अतिशय दुर्मिळ असा असून भारतात मागील वर्षी ५८ रुग्णांची नोंद आढळून आली आहेत तर सन २०१९ मध्ये जगभरात ७३ हजार रुग्ण सापडले असून त्यांपैकी ४८ हजार रुग्ण दगावल्याची नोंद आहे. लहान मुले ते धनुर्वात लस न घेतलेले रुग्ण याची शिकार होत आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *