[ad_1]

अहमदनगर : दिल्लीत जाण्यासाठी भाजपला शेतकऱ्यांची मते हवे असतात, मात्र आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जाते. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या डोक्यावर अशोक चव्हाणांसारखे उपरे आणून ठेवून निष्ठावंतांचा अपमान केला जातो. अशा भाजपला आगामी निवडणुकीत जनता अजिबात थारा देणार नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

उद्धव ठाकरे यांचा आजपासून नगर जिल्हा दौरा सुरू झाला आहे. दुपारी नेवासा तालुक्यात संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ठाकरे यांचे नगर जिल्ह्यात आगमन झाले. त्यावेळी जेसीबीतून फुले उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सोनईतील जगदंबा माता मंदिराच्या प्रांगणात आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्यावतीने जनसंवाद मेळावा झाला. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, आमदार शंकराव गडाख, नगरचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, संदेश कार्ले उपस्थित होते.

भाजपचं हिंदुत्व घरं पेटवणारं

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, सुमारे वीस ते पंचवीस वर्षे शिवसेना भाजपची युती होती. मात्र ही वर्षे अक्षरश: सडली आहेत. तेव्हा हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही भाजपसोबत गेलो. मात्र नंतर कळाले की, त्यांचे हिंदुत्व वेगळे आहे. भाजपचे हिंदुत्व घर पेटविणारे आहे. तर आमचचे हिंदुत्व सामान्य माणसाची चूल पेटवणारे आहे, असे ठाकरे म्हणाले.

शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा : ठाकरेंच्या डोक्यात प्लॅन काय? राऊतांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे मैदानात

फक्त निवडणुकीसाठी मोदींना शेतकऱ्यांची मतं हवीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘फक्त निवडून येण्यासाठी आणि दिल्लीत जाण्यासाठी मोदींना शेतकऱ्यांची मते हवी असतात. नंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. जेव्हा शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीत जाण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांचे रस्ते बंद केले जातात. त्यांच्यावर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. माझा शेतकरी अगोदरच रडतो आहे. त्याला आणखी कशाला रडवता आहात? असा सवाल करून ठाकरे म्हणाले, भाजपने ‘अबकी बार चारसौ पार’, असा नारा दिला असला तरी यावेळी त्यांच्या चाळीस सुद्धा जागा निवडून येणार नाहीत. भाजप सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव दिला नाही. नुकसान भरपाईही दिली नाही. एक रुपयात पीक विमा या योजनेच्या नावाखाली विमा कंपन्या आणि बँकेच्या अधिकाऱ्यांची घरे भरली, असेही ठाकरे म्हणाले.
काँग्रेसमुक्त भारत म्हणणारे आता ‘काँग्रेसव्याप्त भाजप’, अशोक चव्हाण आदर्श घोटाळा लपविण्यासाठी भाजपमध्ये : उद्धव ठाकरे

प्राजक्त आणि त्याचे मामा जागेवरच आहेत ना?

उद्धव ठाकरे यांचं राहुरी येथे आगमन होताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरेंना पाहून- प्राजक्त आणि त्याचे मामा जागेवरच आहेत ना? असे उद्धव ठाकरे म्हणताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

भाजप भाडोत्री-बाजारबुणगे घेतंय आणि निष्ठावंतांना सतरंज्या उचलायला लावतंय | उद्धव ठाकरे

पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून देऊ

यावेळी बोलताना माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला नेवासे तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने निवडून देतील, याची आम्ही ग्वाही देतो.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *