[ad_1]

नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाही या मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग आहे. जडेजाने मालिकेतील पहिला सामना खेळून संघासाठी चांगली कामगिरी केली. मात्र, तरीही टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही. हैदराबाद कसोटी सामन्यादरम्यानच जडेजाला धावा घेताना दुखापत झाली होती. याच दुखापतीमुळे खेळाडूला दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडावे लागले. तिसऱ्या कसोटीत जडेजाच्या पुनरागमनाची चर्चा असतानाच रवींद्र जडेजाबाबत नवा वाद सुरू झाला. हा वाद इतर कोणात नाही तर जडेजाच्या घरातच सुरू झाला आहे.

वडील आणि मुलामध्ये गेल्या काही वर्षांपासून बोलणं नाही

रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंग जडेजा यांनी या फलंदाजाबाबत एक धक्कादायक विधान केले आहे. आपल्या कामगिरीने संपूर्ण देशाला आपला फॅन बनवणारा खेळाडू रवींद्र जडेजाचे त्याच्या वडिलांशी चांगले संबंध नाहीत. जडेजा आणि त्याच्या वडिलांमध्ये वर्षानुवर्षे बोलणेही झालेले नाही. त्याचे वडील अनिरुद्ध जडेजा ना जडेजाशी बोलतात, ना त्यांच्या सुनेशी. खुद्द जडेजाच्या वडिलांनी मीडियाला ही माहिती देत जडेजा आणि त्याच्या पत्नीबद्दल धक्कादायक विधान केले आहे.

काय म्हणाले जडेजाचे वडील?

रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध जडेजा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा संपूर्ण प्रकार सांगितला. अनिरुद्ध यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा रवींद्र जडेजा अनेक वर्षांपासून त्याच्या संपर्कात नाही. अनिरुद्ध जामनगरमधील २ बीएचके फ्लॅटमध्ये एकटेच राहतात. एक काळ असा होता की अष्टपैलू खेळाडूही वडिलांसोबत एकाच फ्लॅटमध्ये राहत असे, पण आता अनिरुद्ध या फ्लॅटमध्ये एकटेच राहतात आणि २० हजार रुपये पेन्शन घेऊन आपला उदरनिर्वाह करतात.

जडेजाच्या वडिलांनी सांगितले की, रवींद्रचे लग्न झाल्यापासून पुढचे २-३ महिने सर्व काही ठीक चालले, पण त्यानंतर जडेजाचे वागणे बदलू लागले. मला माहित नाही की त्याची पत्नी रिवाबा सोलंकी हिने माझ्या मुलावर अशी काय जादू केली की माझा मुलगा माझ्याशी बोलत नाही.

अनिरुद्ध म्हणाले की, आमच्यात जवळपास ५ वर्षांपासून कोणतेही नाते नाही. ना ते आम्हाला कॉल करत ना आम्ही त्यांना कॉल करत. लग्नानंतर माझा मुलगा पूर्णपणे बदलला आहे. त्याच्या पत्नीने त्याच्यावर काय जादू केली आहे काय माहित, त्यामुळे त्याने माझ्याशीही संबंध तोडले आहेत. त्याचे वडील पुढे म्हणाले की, मी माझ्या मुलाला क्रिकेटपटू बनवले नसते तर बरे झाले असते. त्याने लग्नच केले नसते तर बरे झाले असते, नाहीतर मला हा दिवस बघायला मिळाला नसता. तिला फक्त पैसा हवाय. यावरून जडेजा आणि वडिलांचे नाते संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी वडिलांनी जडेजाच्या पत्नीला जबाबदार धरले आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *