[ad_1]
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
निखिल वागळे यांच्या गाडीवरील हल्ल्या प्रकरणी गुन्हा नोंद करताना पुणे पोलिसांनी लावलेल्या कलमांवर सुषमा अंधारे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सुषमा अंधारे यांनी गेल्या वर्षी घडलेल्या घटनेचा आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याचा दाखला दिला आहे. उदय सामंत यांच्या गाडीची काच गेल्या वर्षी पुण्यातील कात्रज परिसरात शिवसैनिकांकडून फोडण्यात आली होती. त्या प्रकरणी पुणे पोलिसांनी कोणती कलमं लावली होती त्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली होती.
उदय सामंत यांच्या गाडीवर छोटासा ओरखडा उठला तेव्हा शिवसैनिकांवर भादवी 307, 353, 323 इतर 9 गुन्हे टाकले.
निखिल वागळे यांची गाडी फोडून प्राणघातक हल्ला झाला.
त्यांच्यावर फक्त 324, सगळे टेबल जामीन घेऊन
पुरस्कार घेत आहेत. @waglenikhil @Dev_Fadnavis @OfficeofUT#सरकारप्रायोजितहल्ले
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) February 12, 2024
सुषमा अंधारे म्हणाल्या की, उदय सामंत यांच्या गाडीवर छोटासा ओरखडा उठला तेव्हा शिवसैनिकांवर भादवि ३०७, ३५३, ३२३ इतर ९ गुन्हे टाकले होते. दुसरीकडे निखिल वागळे यांची गाडी फोडून प्राणघातक हल्ला झाला. त्या प्रकरणात फक्त कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सगळे टेबल जामीन घेऊन पुरस्कार घेत आहेत, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
संजय राऊत काय म्हणाले होते?
निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम चौधरी यांच्यावर पुण्यात हल्ला झाला होता. त्यापूर्वी पुणे पोलीस आयुक्तपद स्वीकारणाऱ्यांनी गुंडांची परेड काढली होती. निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचं काय झालं? पुणे पोलीस आयुक्तांनी गुंडांची परेड केली. वागळेंवर हल्ला करणाऱ्या गुंडांची परेड पोलीस आयुक्तांनी का काढली नाही. पुणे पोलीस आयुक्तांनी नाटकबाजी बंद करावी. वागळेंवर हल्ला करणाऱ्यांची देखील परेड पोलिसांनी काढली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
दरम्यान, पुणे पोलिसांनी निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांसह निर्भय बनोच्या सभेच्या आयोजकांवर देखील गुन्हे दाखल केले आहेत.
[ad_2]
Source link