[ad_1]

नवी दिल्ली : एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या शोधात अडकलेला दिसत आहे. खुद्द कर्णधार रोहित शर्मानेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. रोहित शर्माने आपल्या एका वक्तव्यात म्हटले आहे की, युवराज सिंगच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी एकही फलंदाज सापडलेला नाही. या स्थानावर खेळण्याची टीम इंडियाची मानसिकता नवीन नाही. २०१९ च्या विश्वचषकापासून हे सुरू असल्याचे दिसते.

रोहितने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, ‘कोणत्याही खेळाडूची आपोआप निवड होत नाही. माझी स्वतःचीही नाही. संघातील कोणाचेही स्थान निश्चित झालेले नाही. अशा परिस्थितीत प्रत्येकाला चांगला खेळ करावा लागेल, तरच त्यांना संघात स्थान मिळू शकेल.

१ धावेने अर्धशतक हुकलं पण तिलक वर्माने केला विक्रम, थेट टी-२० किंग सूर्या दादाच्या रेकॉर्डची बरोबरी
शर्माच्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबद्दल रोहित म्हणाला, ‘मी कर्णधार नसतानाही ही गोष्ट माझ्या लक्षात आली. चौथ्या क्रमांकासाठी अनेक खेळाडू आले आणि गेले. एखादा जखमी झाला किंवा निवडीसाठी उपलब्ध नव्हता किंवा कोणीतरी त्याचा फॉर्म गमावला.’

विराट, सूर्या आणि जडेजाचं टेन्शन का वाढणार?

रोहित शर्माने टीम इंडियातील त्याच्या स्थानाबद्दल जे काही सांगितले त्यावरून अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी काही काळ प्रयत्न केले गेले, परंतु ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये सूर्यकुमारची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. तर रवींद्र जडेजा या जागेचा दावेदार मानला जात असला तरी तो छाप पाडू शकला नाही. अशा परिस्थितीत विश्वचषक २०२३आधी पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीबाबत कठीण प्रश्न निर्माण झाले आहेत. श्रेयस अय्यरची कामगिरी पाहता त्याने या स्थानावर दमदार कामगिरी दाखवली असली तरी दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे.

कोण आहे अलीशा? लेस्बियन की बाय-सेक्शुअल, मैदानावरील गोलपेक्षा चर्चा भलत्याच गोष्टींची
अशीच काहीशी समस्या विराट कोहलीलाही येऊ शकते. टीम इंडियामध्ये शुभमन गिलने सातत्याने आपल्या फलंदाजीने छाप पाडली आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून त्याने पदार्पण केले असले तरी वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत शुभमनने या स्थानावर चांगला खेळ केला तर विराट कोहलीसाठीही अडचण निर्माण होऊ शकते.

चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरची कामगिरी

चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, दुखापतीनंतर पुनरागमन करण्याच्या तयारीत असलेल्या श्रेयस अय्यरने २० सामन्यांत ८०५ धावा केल्या आहेत ज्यात दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित अय्यरबाबत म्हणाला, ‘श्रेयस अय्यर काही काळ चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता आणि त्यानेही चांगली कामगिरी केली. त्याची आकडेवारी खरोखर छान आहे. दुखापतींमुळे तो काही काळासाठी बाहेर आहे आणि खरं सांगायचं तर गेल्या चार-पाच वर्षांपासून असंच होतंय. यातील अनेक खेळाडू जखमी झाले आणि अशा परिस्थितीत नवीन खेळाडूला त्या ठिकाणी फलंदाजीसाठी उतरावे लागले.’

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *