[ad_1]
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला बार्शीटाकळी तालुक्यात टिटवा गाव आहे. या गावात नागोराव गावंडे हे वास्तव्यास आहेत. त्यांना दोन मुलं असून त्यातील एकाचं नाव संदीप आहे. मृत संदीप हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. दरम्यान, संदीपचं गावातील एका अनुसूचित जमातीतील कुटुंबातील मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करण्याचा निश्चय केला. परंतु हे प्रेम संदीपचे वडील नागोराव यांना मान्य नव्हतं. याच्यावरून अनेकदा त्यांच्या घरात वाद व्हायचा. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं. ही गोष्ट संदीपच्या वडिलांना समजली आणि त्यांनी यावर कायम तोडगा करण्याचा निश्चय केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, टिटवा गावात शुक्रवारी संदीप गावंडे याचा राहत्या घरात हातपाय बांधून असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दरम्यान, संदीपचे घरचे सर्वजण बाहेरगावी गेले होते. घरचे घरी परतले असता त्यांना घरात संदीप मृत अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी एकच टाहो फोडला. याची माहिती पिंजर पोलिसांना देण्यात आली आणि पिंजर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. याशिवाय, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करून तपासादरम्यान वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचं निष्पन्न झालं.
असा काढला मुलाचा काटा
अनुसूचित जमातीतील मुलीवर प्रेम का केले, लग्नही करणार, असा सवाल करत वडील नागोराव यांनी संदीपसोबत वाद घातला. यादरम्यान, त्याच्याच भावाने आणि वडिलांनी घरातच संदीपला गळा आवळून संपवले. त्यानंतर संदीपचे हात-पाय वायरने बांधून घराला कुलूप लावले आणि बाहेरगावी निघून गेले. घरी परतले असता आपल्या मुलाला कोणीतरी मारलं असा बनाव रचला. पण, पोलिसांच्या तपासात सर्व बिंग फुटलं. सद्यस्थितीत मारेकरी वडील आणि भाऊ पोलिसांच्या ताब्यात आहे
[ad_2]
Source link