[ad_1]

रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गावर चालत्या लक्झरी बसने पेट घेतला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. हा सगळा अनर्थ बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे नाही तर बसमधून प्रवास करत असलेल्या एका युवकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळल्याची माहिती समोर आली आहे. सगळे प्रवासी गाढ झोपेत असताना चालत्या बसने पेट घेतला. मात्र, हा सगळा प्रकार बसमधून प्रवास करत असलेल्या रत्नागिरी येथील आर्यन नामक युवकाच्या लक्षात आल्याने बसमधील एकूण २१ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

अक्षय भाटकर यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मुंबई – गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात महाड येथे सावित्री पुलाजवळ हा सगळा प्रसंग घडला. गुल हसन हबीबरुला पठाण असं या बस चालकाचं नाव आहे. ज्या युवकाने या सगळ्या प्रवाशांना वाचवले तो युवक आर्यन भाटकर हा मूळचा रत्नागिरी मिर्‍या येथील आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी या बसमध्ये १९ प्रवासी तसेच बस चालक व दोन क्लिनर असे एकूण २१ जण होते. या सगळ्या दुर्घटनेत आकांक्षा व आर्यन या दोन्ही बहीण भावाने सगळ्या प्रवाशांना जागे करून खाली उतरवले म्हणून मोठा अनर्थ टळला.

काल मंगळवारी मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेवाडी फाट्याजवळ औदुंबर ट्रॅव्हल्सची लक्झरी बस जळून खाक झाल्याची घटना घडली. औदुंबर ट्रॅव्हल्सची MH 08 9779 क्रमांकाची लक्झरी बस रत्नागिरीवरुन मुंबई येथे निघाली होती. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील राजेवाडी फाट्याजवळ बस आली असता बसचा टायर गरम होऊन फुटल्याने आग लागल्याचे चालक गुलशन पठाण यांच्या लक्षात येताच त्यांनी लक्झरी बस रस्त्याच्या साईडला घेतली.

हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येतात आर्यनने बसमध्ये आपली बहीण आकांक्षा हिलाही उठवले. टायरला आधी छोट्या प्रमाणात आग लागली नंतर ही आग वाढत गेली. या दरम्यान काही क्षणाचा विलंबना न करता या युवकाने व त्याची बहीण आकांक्षा हीने सगळ्या प्रवाशांना उठवले म्हणून मोठा अनर्थ टळला. आर्यन व आकांक्षा या दोघांनी इतर प्रवाशांना जागे करून उठवले व बसमधून खाली उतरवले तसेच आर्यन यानेच आपल्या मोबाईलवरुन पोलीस व फायर ब्रिगेडला फोन केला. काही मिनिटातच अवघ्या बसने पेट घेतला अशी प्रतिक्रिया आर्यन भाटकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’जवळ बोलताना दिली आहे.

आर्यन हा मुंबई दादर येथे आयसीएस हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाचा विद्यार्थी असून आकांक्षा ही डी.जे रुपाली महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. या सगळ्या दुर्घटनेत काही प्रवाशांचे सामान जळून खाक झाले असून आर्यन व आकांक्षा यांची बॅग या आगीत जळून भस्मसात झाली. या सगळ्या प्रसंगात रत्नागिरीचा आर्यन व आकांक्षा या दोघांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतूक होत आहे. तसेच या बॅगेत सोबत असणारे महाविद्यालयात लागणारी फीसाठी घेऊन जात असलेली एक लाखाची रोकडही या आगीत भस्मसात झाल्याची माहिती आर्यन भाटकर याने दिली.

या दुर्घटनेत बसमध्ये दोन चालकांसह २१ प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने लक्झरी बसमधील सर्व प्रवासी बचावले आहेत. घटनास्थळी महाड एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत आगीत लक्झरी बस पूर्णतः जळून खाक झाली होती. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री.राठोड करत आहेत.

उत्तराखंड विधानसभेची समान नागरी संहितेला मंजुरी, भाजपशासित राज्ये कित्ता गिरवणार

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *