[ad_1]
भारतीय हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी आजपासून सकाळच्या वेळी किमान तापमानात घट नोंदवली जाईल, असा अंदाज वर्तवला. भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी पश्चिमी चक्रावातामुळं कमाल तापमानामध्ये पुण्यात ३ ते ४ अंशांची घट होईल, असा अंदाज वर्तवला.
पुण्यात ८ फेब्रुवारीपर्यंत शिवाजीनगरमध्ये तापमान ११.१२ अंश सेल्सिअसपर्यंत येईल. लोहगावमध्ये तापमान १० ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत येऊ शकते. या काळात किमान तापमान १० अंशाच्या खाली येण्याच्या शक्यता नाकारता येणार नाही, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. पश्चिम चक्रावाताच्या परिणामामुळं सोमवारी पुण्यात किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली होती, असंही कश्यपी यांनी म्हटलं होतं.
हवामान अभ्यासक विनीतकुमार सिंग यांनी आयएमडी जीएफसच्या अंदानुसार शिवाजीनगरमधील किमान तापमान ६ ते १० फेब्रुवारीदरम्यान ३-५ अंशांपर्यंत जाऊ शकतं असा अंदाज वर्तवला आहे.
पुण्यातील किमान तापमान ६ ते ८ फेब्रुवारीच्या दरम्यान १५-१७ अंश सेल्सिअस राहू शकतं. ९ फेब्रुवारीला किमान तापमानात खट होऊन ते १४ ते १६ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होऊ शकतं. त्यानंतर १० ते ११ फेब्रुवारीदरम्यान किमान तापमानात चढ उतार होत राहतील, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या हवामानाच्या मॉडेलच्या मार्गदर्शनानुसार, येत्या ४,५ दिवसांत राज्यात किमान किंवा कमाल तापमानात फारसा बदल किंवा घसरण अपेक्षित नाही, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. मुंबईत कुलाबा येथे किमान तापमान २१. ५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं तर, सांताक्रुझ येथे १९. ४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
[ad_2]
Source link