[ad_1]

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १ फेब्रुवारी रोजी बजेट (अर्थसंकल्प) सादर केला. देशातील प्रत्येक वर्गाला या बजेटकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळे मोदी सरकारने कोणत्याही मोठी घोषणा करण्याचं टाळलं. अर्थसंकल्प अधिवेशनआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात त्यांच्यादृष्टीने केवळ चार जाती असल्याचं म्हटलेलं. तसेच या चार जातींच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले, त्यामुळे या चार जातींच्या विकासावर अधिक लक्ष देण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांच्या भाषणातून दिसून आले. बजेटमध्ये त्यांच्यासाठी खास तरतूद करण्यात आल्या.

केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये गरीब, युवा, किसान आणि महिला या ‘GYAN’ वर फोकस ठेवून यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणा केल्या. महिला, शेतकरी, तरुण आणि गरीब या चार स्तंभांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांबद्दल अर्थमंत्र्यांनी भरपूर चर्चा केली आहे. निर्मलाने आपल्या भाषणात या चौघांचा खूप उल्लेख केला. निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांचाही उल्लेख केला.

महिला सशक्तीकरणावर सरकारचा भर
महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने ३० कोटी मुद्रा योजना कर्ज महिला उद्योजकांना दिली, उच्च शिक्षणातील महिलांचे प्रवेश २८ टक्क्यांनी वाढले असून महिलांच्या मनुष्यबळातील संख्या वाढली. तसेच ट्रिपल तलाकला बेकादेशीर ठरवण्यात आलं आणि एक तृतियांश जागा लोकसभा व विधानसभेत राखीव ठेवण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आलं.

अर्थसंकल्पात GYAN वर लक्ष केंद्रित

शेतकरी (अन्नदाता)
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मागील दहा वर्षामध्ये आणलेल्या योजनांमध्ये सुधारणा होणार आणि शेतकऱ्यांचा माल टिकावा यासाठी गोदामांची अधिकाधिक व्यवस्था केल्या जातील.
देशात लवकरच आत्मनिर्भर तेलबिया अभियान सुरू केले जाईल जेणेकरून तेलबिया इतर देशांकडून आयात करण्याची गरज लागणार नाही.
दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वंकष योजना आणणार
दूध उत्पादकांना दिलासा, राष्ट्रीय गोकुल मिशनसारख्या योजनांना बळ देणार

महिलांसाठी बजेटमध्ये काय खास
गेल्या १० वर्षांत महिला सक्षमीकरणावर भर, महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल
तिहेरी तलाक हा मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय
पीएम आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात ७० टक्के महिलांना घरे
नऊ कोटी महिला उद्योजकांचे देशाच्या जडणघडणीत योगदान

गरिबांना काय मिळणार
देशातील मध्यमवर्गीयांच्या घरांसाठी नवी योजना
जे लोक चाळी, अनधिकृत तसेच झोपड्यांमध्ये राहतात त्यांचे स्वतःचे घर होण्यासाठी प्रयत्न
एक कोटी गरिबांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज
नऊ ते चौदा गटातल्या मुलीचे गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये यासाठी लसीकरण करणार
आयुष्मान भारत योजना सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना मिळणार

तरुणांना काय
डाटा आणि नवीन तंत्रज्ञानामुळे उद्योग व आयुष्यामध्ये वेगाने बदल होत आहे. या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वापर्यंत पोहचवण्याचा सरकारचा प्रयत्न असेल आणि शेवटच्या माणसालाही त्याचा लाभ करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील. मोदींनी यंदा विस्तारित घोषणा – जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान. यानुसार टेकसॅव्ही तरुणांसाठी सुवर्णकाळ ठरेल आणि एक लाख कोटी रुपयांचा कॉर्पस निधी आणि कर्जाची उपलब्धता करून दिली जाईल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *