[ad_1]

जळगाव: नातेवाईकाच्या दहाव्याचा कार्यक्रमासाठी लाकडे घेऊन जात असताना अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्याने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर तापी नदीत कोसळल्याने ट्रॅक्टर चालकाचा दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना नांद्रा येथे आज रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. वासूदेव गोपीचंद सपकाळे (४५) असे मयत झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
दोन महिन्यांवर लग्न; मात्र नियतीच्या मनात भलतंच, आनंदी आयुष्याचं स्वप्न रंगवत असतानाच तरुणीनं घेतला जगाचा निरोप
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे वासूदेव गोपीचंद सपकाळे हे आपल्या पत्नी, दोन मुलं आणि मुलीसह वास्तव्याला होते. नांद्रा गावात त्यांच्या मामी यांचे निधन झाले होते. त्यांच्या दहाव्याचा कार्यक्रम असल्याने वासूदेव सपकाळे हे गुरूवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी लाकडे घेण्यासाठी ट्रॅक्टरवर एकटेच गेले होते. लाकडे भरून नांद्रागावाकडे तापी नदीच्या रोडने येत असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. यामुळे त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रॅक्टर थेट तापी नदीत कोसळला. या अपघातात वासूदेव सपकाळे हे देखील पाण्यात पडले. त्यांच्या डोक्यावर ट्रॅक्टरचे स्टेअरींग पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

लेकरांना १०० आणि मोठ्यांना २०० रुपयात, गाढविनीच्या एका लीटरसाठी १२ हजार रुपये, कुटुंबाचा पिढीजात व्यवसाय

ही घटना घडल्यानंतर काही अंतरावर गावातील अजय दिलीप सोनवणे हा तरूण नदीच्या काठावरील विहिरीजवळ काम करत असताना त्यांच्या लक्षात आले. त्याने आरडाओरड करत घटनास्थळी धाव घेतली. गावातील ग्रामस्थ आणि तरूणांनी धाव घेत वासूदेव सपकाळे यांचा मृतदेह बाहेर काढला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. आदीच दहाव्याचा कार्यक्रम आणि त्यातच ही मृत्यूची माहिती पोहोचल्यानंतर सर्व नातेवाईक सुज्ञ झाले होते. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.

म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *