[ad_1]

कोल्हापूर : महाराष्ट्रात आतापर्यंत मुंबई-अहमदाबाद, मुंबई -शिर्डी, मुंबई-सोलापूर, मुंबई-मडगाव, नागपूर-बिलासपूर या वंदे भारत ट्रेन सुरु आहेत. कोल्हापूर ते मुंबई आणि पुणे- बेळगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली होती. कोल्हापूर-मुंबई दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार यासंदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे माहिती दिली आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणींचं कारण देत या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस मार्च २०२४ नंतर धावू शकते असं म्हटलं. या मार्गावरील तांत्रिक अडचणी, रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण, पुणे मिरज मार्ग दुहेरी करण्याची कामं मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणार असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं.

मिरज- पुणे मार्गाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचं काम सध्या सुरु आहे. कोल्हापूर आणि मिरज दरम्यानचा मार्ग एकेरी आहे. त्यामुळं प्रवासाचा वेळ वाढत जातो. जेव्हा आमची कामं पूर्ण होतील, त्यावेळी वंदे भारत ट्रेन सुरु करणं शक्य होईल, असं विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी म्हटलं.
मंडणगड येथे मोठा अपघात; एसटी बस पलटल्याने चालक, वाहक आणि नऊ प्रवासी जखमी
मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी या गोष्टीकडे राजकीय नजरेनं पाहिल्यास वंदे भारत ट्रेन लगेच सुरु होऊ शकते, असं म्हटलं. मात्र, रेल्वेनं जिथं ही ट्रेन अधिक वेगानं धावू शकेल त्या ठिकाणी वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं कोल्हापूर- मिरजकरांसाठी वंदे भारत ट्रेन काही काळासाठी स्वप्न राहील, असं त्यांनी म्हटलं.

कोल्हापूर, सांगली आणि मिरजमधील रेल्वे प्रवासी संघाकडून कोल्हापूर-मुंबई आणि पुणे- बेळगाव मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याची मागणी केली आहे. वंदे भारतमुळं प्रवासाचा वेळ तीन ते चार तासांनी वाचेल, असे त्यांचं मत आहे.
शेतकऱ्यांच्या कामाची बातमी, जमिनीच्या मोजणीसाठी आता वाट पाहावी लागणार नाही, कारण…
मुंबई कोल्हापूर दरम्यान रेल्वेनं प्रवास करणाऱ्या बाळासाहेब पाटील यांनी कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसला कोल्हापूर पुणे प्रवासासाठी ६ तास ४० मिनिटांचा वेळ लागतो असं म्हटलं. तर इतर रेल्वे गाड्यांना साडे सात तासांचा वेळ लागतो. सध्या कोल्हापूर मुंबई प्रवासाचा वेळ ११ ते १३ तासांचा आहे. प्रवासाचं हे अंतर बसनं ७ ते ८ तासात पूर्ण होतं. त्यामुळं प्रवासी रेल्वेऐवजी बसचा पर्याय निवडतात, असं बाळासाहेब पाटील म्हणाले.

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत सुप्रिया सुळे आक्रमक, ९ सरकारं पाडली म्हणत भाजपला घेरलं

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *