[ad_1]

मुंबई : अभिषेक घोसाळकर गोळीबार आणि हत्या प्रकरणावरुन विरोधक फायदा उचलत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, “ही गोष्ट फायदा घेण्याची आहे का? आमच्या एका तरुण सहकाऱ्याची हत्या झालेय. तुमचे चिरंजीव ज्या माफियाला जाऊन भेटले, त्याला बोला” असं उत्तर राऊत यांनी दिलं.

संजय राऊत काय म्हणाले?

“गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गुंडांनी गुंडासाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र सरकार असल्याचं मी सांगत आहे. मंत्रालयात आणि नागपूरच्या विधानभवनातही अनेक गुंड, गुन्हेगार, माफिया हे सातत्याने मुख्यमंत्री आणि बाळराजेंना भेटत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या स्वागत आणि अभिनंदनाचे बोर्ड गुंड आणि माफिया लावत आहेत. अनेक सरकारी कामं, कंत्राटं गुंडांना दिली जात आहेत. ८ हजार कोटींचं अॅम्ब्ल्युलन्स काँट्रॅक्ट कोणाला दिलंय, हे लवकरच बाहेर येईल. बाळराजेंकडून त्यांच्यावर दबाव आहे. अनेक माफिया याचे लाभार्थी आहेत. सरकारी पैशांनी गुंडगिरी वाढवायची, पोलीस हे गुंडांचे संरक्षक झाले आहेत. शिंदेंच्या टोळीत गुंड आणि पोलीस एकत्र आहेत. मुंबई-ठाण्यात नेमणुका झालेले पोलीस शिंदे गँगचे सदस्य आहेत. त्यांची यादी तयार आहे, हिशोब २०२४ च्या निवडणुकीत होईल” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

“गणपत गायकवाड सांगत आहेत की एकनाथ शिंदेंमुळे मी गोळीबार केला आणि माझे कोट्यवधी त्यांच्याकडे पडले आहेत, तरी पोलीस त्यांच्याविरुद्ध कारवाई करत नाहीत.” यावरुन संजय राऊत यांनी खेद व्यक्त केला.

“शिवसेनेतील आमचे जवळचे सहकारी, माजी आमदार, उपनेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव असलेले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची उघडपणे निर्घृण हत्या झाली. यानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे नंगानाच पाहायला मिळाला, तो अस्वस्थ करणारा आहे. इतिहासात असं कधी घडलं नाही. गेली दीड वर्ष केवळ गुंडगिरीच्या बातम्या पाहायला मिळत आहेत.” असं संजय राऊत म्हणाले.

तावडे, पाटील, चित्रा वाघ; राज्यसभेच्या तीन जागांसाठी भाजपची ९ नावं चर्चेत, पंकजांनाही तिकीट?
“राज्याचे गृहमंत्री अदृश्य आहेत. विदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत चाय पे चर्चा करत आहेत. महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर कोण चर्चा करणार, वर्षा बंगल्यावर गुंडांसोबत चाय पे चर्चा होते, याची माहिती आहे का गृहमंत्र्यांना? देवेंद्र फडणवीस अपयशी आणि अकार्यक्षम गृहमंत्री आहेत. शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्ही गृहमंत्री झालात का? महाराष्ट्रातील जनता तुमच्याकडे राजीनामा मागत आहे. अन्यथा गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई करा. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं हे अपयश आहे. त्यांनी अशाप्रकारचं माफियाराज महाराष्ट्रावर लादलं. हा सूड आहे महाराष्ट्रावर, मोदी-शहा राज्याचे अपराधी आहेत. मुख्यमंत्र्यांना ताबडतोब काढा, सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut : गुंडांनी गुंडासाठी चालवलेले राज्य; आणखी एका गँगस्टरचा शिंदेंसोबत फोटो, संजय राऊत यांचा धडाका सुरुच
“मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे का, म्हणजे आणखी शंभर गुंड येतील, देवेंद्र फडणवीस दिल्ली कशासाठी गेलेत, आणखी खून करण्याची सुपारी घ्यायला का? मुंबईत दिवसाढवळ्या लोकप्रतिनिधीची हत्या होते कॅमेरासमोर आणि ते वाढदिवस कसले साजरे करता? दीड वर्ष भोगलंत, महाराष्ट्राची वाट लावण्याची इच्छा पूर्ण झाली ना, आता बाजूला व्हा” असंही राऊत म्हणाले.

कुणाची मस्ती असेल तर ती पोलिसी खाक्या दाखवून कंट्रोलमध्ये आणावी लागेल, अजित पवारांनी कुणाला दिला इशारा?
“अजित पवार म्हणाले की विरोधक या प्रकरणाचा फायदा घेत आहेत. ही गोष्ट फायदा घेण्याची आहे का? आमच्या एका तरुण सहकाऱ्याची हत्या झालेय, तुमचे चिरंजीव ज्या माफियाला जाऊन भेटले, आधी त्याला बोला, तुमच्यावर आर्थिक माफियाचे आरोप आहेत, त्यावर बोला, कोण बदनाम करतंय महाराष्ट्राला? पंतप्रधान तुम्हाला ओळखतात म्हणता, विचारतात ना एअरपोर्टला… काय अजित? ७० हजार कोटींचा घोटाळा पंतप्रधानांनी बाहेर आणला, आम्ही नाही. कोण फायदा घेताय, तुम्ही आर्थिक माफियागिरीचे लाभार्थी आहात.” असा घणाघातही राऊतांनी केला.

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *