[ad_1]
बुधवारच्या सुनावणीत त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या वृत्तासह अनेक भागांतील रस्त्यांच्या दुर्दशेच्या अनेक बातम्या निदर्शनास आणल्या. त्याची मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने अत्यंत गंभीर दखल घेतली. ‘उच्च न्यायालयाचे आदेश पाच वर्षांपूर्वीचे असूनही अद्याप त्याचे प्रभावी पालन झालेले नाही. एवढा कालावधी महापालिकांच्या प्रमुखांना पुरेसा नाही का? त्यांनी एकप्रकारे न्यायालयाचा अवमानच केल्याचे दिसत आहे. आता त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितल्याविना काही कार्यवाही होईल, असे दिसत नाही’, अशा तिखट शब्दांत खंडपीठाने आपली नाराजी व्यक्त केली.
अखेरीस ‘आदेशपालन केले नसल्याबद्दल तुम्हाला जबाबदार का धरू नये’, अशी विचार करत त्याबाबत शुक्रवारी सकाळी स्वत: हजर राहून स्पष्टीकरण देण्याचा आदेश खंडपीठाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार व मिरा-भइंदर या महापालिकांच्या प्रमुखांसाठी काढला.
तरुणाच्या मृत्यूबद्दल चौकशीचा आदेश
दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू हा खड्ड्यांमुळे नसून अन्य कारणाने झाला आहे, असा दावा कल्याण-डोंबिवली महापालिकेने आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. त्यामुळे या मृत्यूच्या चौकशीसाठी खंडपीठाने अॅड. मानसी नाईक व अॅड. रश्मी मोरे यांना ‘कोर्ट कमिश्नर’म्हणून नेमले आहे. ‘या दोन्ही वकिलांनी घटनास्थळी जाऊन तेथील लोकांशी बोलून तसेच कुटुंबीयांशी व पालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून अहवाल द्यावा. त्याबाबत शुक्रवारी तारीख देऊ. त्यांना चौकशीकामी येणारा सर्व खर्च तसेच अतिरिक्त १५ हजार रुपये मेहनताना महापालिकेने द्यावा’, असेही खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.
[ad_2]
Source link