[ad_1]

अहमदाबाद: आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये यजमान भारत अंतिम फेरीत दाखल झाला आहे. विजेतेपदापसाठी टीम इंडियाची लढत ५ वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या लढतीच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक मोठी अपडेट दिली आहे. जर भारताने आज विजय मिळवला तर त्यांना इतिहास घडवण्याची संधी आहे. भारत फक्त तिसरे विजेतेपद मिळवणार नाही तर असे अनेक विक्रम करेल जे आजवर कोणाला करता आले नाहीत.

१) जर भारताने आज विजेतेपद मिळवले तर १९८३ आणि २०११ नंतर हे त्यांचे तिसरे वर्ल्डकप विजेतेपद ठरेल. भारत हा पहिला असा देश ठरले जो घरच्या मैदानावर दोन वर्ल्डकप जिंकले. याआधी त्यांनी २०११ साली श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते.

२) विराट कोहलीने या स्पर्धेत ७११ धावा केल्या आहेत. एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. या स्पर्धेत त्याने वनडेतील ५०वे शतक झळकावले होते. अंतिम सामन्यात जर त्याने ८९ धावा केल्या तर वर्ल्डकपमध्ये ८०० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरेल.

विराट कोहलीसारखी संधी अपवादाने एखाद्याला मिळते; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये एकटा करू शकतो ७ मोठे वर्ल्ड रेकॉर्ड
३) भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर वर्ल्डकपमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. जर आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने शतक केले तर ही आघाडी अजून वाढवता येईल. रोहितने वर्ल्डकपमध्ये ७ शतक केली आहेत.

४) रोहितने या स्पर्धेत ५५० धावा केल्या आहेत. २०१९ साली त्याने ६४८ धावा केल्या होत्या. आज त्याने ९९ धावा केल्यास स्वत:चा विक्रम मोडण्याची संधी आहे.

IND vs AUS Final Live Updates: वर्ल्डकप २०२३ फायनल- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाइव्ह अपडेट
५) मोहम्मद शमीने ३ वर्ल्डकपमध्ये ५४ विकेट घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात जर शमीने ३ विकेट घेतल्या तर तो वसीम आक्रम आणि लसित मलिंगा यांच्या ५५ आणि ५६ विकेटचा विक्रम मागे टाकू शकेल. वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील चौथ्या क्रमांकाचा यशस्वी गोलंदाज ठरले.

६) श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत २४ धावा केल्यास सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर एका स्पर्धेत ५५० धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज होऊ शकेल.

World Cup Final: वर्ल्डकप फायनलचा निकाल फक्त आणि फक्त रोहितच्या हातात; २०१५ साली मॅक्युलमने केलेली चूक टाळली तर भारत होणार विश्वविजेता
७) केएल राहुलने अंतिम सामन्यात ३४ धावा केल्या तर तो महान कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या ७८० धावांचा विक्रम मागे टाकले. तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा आठवा फलंदाज ठरले.

Read Latest Sports News And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *