[ad_1]

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा निकाल लागताच अजित पवार व शरद पवार गट आमने-सामने उभे ठाकले. अजित पवार गटाने बुधवारी जल्लोष करीत शरद पवार यांच्या छायाचित्राला पडद्याने झाकले; तर, शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने करून निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला मिळाल्याचा बुधवारी बजाजनगर येथील विभागीय कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. शहराध्यक्ष प्रशांत पवार व जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आतषबाजी केली.

खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संख्या लक्षात घेता हा सत्याचा विजय झाला. लोकशाहीची हत्या झाल्याचा विनाकारण कांगावा केला जात आहे, अशी तोफ प्रशांत पवार यांनी डागली.

वडील वा वडीलधारी मंडळी मुलांसाठी भूखंड घेतात. त्यावर घर बांधणे, विस्तार करणे, ज्येष्ठांचा सांभाळ करण्याचे काम मुलाचे आहे. अजित पवार कर्तबगार निघाले. प्रशासनावर त्यांची पकड आहे. राज्य चालवून राहिले. मात्र, ज्यांना कामे जमली नाहीत, अशांचे पोट दुखू लागले. स्वत:ला मानसपुत्र म्हणवून घेणाऱ्यांना शरद पवार यांचा नातूच मानत नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.

आमच्याविरोधात ४ महिन्यांपासून अपप्रचार चालला होता. अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांचे भक्कम पाठबळ असल्याने शहर व ग्रामीणमधील दरी आता दूर होईल. अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्यांनाही आता संधी मिळेल, असे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर म्हणाले. पक्ष व चिन्हाचा हक्क फक्त अजित पवार यांच्याकडेच होता. निवडणूक आयोगाने योग्य निर्णय दिला. आगामी काळात पक्षाचे बळ दिसून येईल, असा विश्वास महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी व्यक्त केला.

यावेळी करण्यात आलेल्या जल्लोषात ईश्वर बाळबुधे, श्रीकांत शिवणकर, अनिल अहिरकर, मिलिंद महादेवकर, योगेश धनुष्कर, संदीप सावरकर, रवी पराते, अरविंद भाजीपाले, प्रशांत अग्रवाल, योगेश ठाकरे, राकेश बोरीकर, भागेश्वर फेंडर, पुंडलिक राऊत, मनीषा लाकडे, राहुल कामडे, सचिन चव्हाण, अभिलाषा वनमाळी, लक्ष्मी सावरकर, करिश्मा चुटे, माधुरी पालिवाल, अरविंद ढेंगरे आदी सहभागी झाले होते.
राष्ट्रवादीत ना खुशी-ना गम; निवडणूक आयोगाचा निकालाने अजित पवार गटाला बळ
शरद पवार गटाची निदर्शने

शरद पवार गटाच्यावतीने शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाच्या विरोधात व्हरायटी चौकात निदर्शने करण्यात आली. राज्यकर्त्यांकडून गेल्या काही महिन्यांपासून सत्तेचा कसा गैरवापर केला जातो, हे सर्वांना कळत आहे. त्यामुळे हा निकाल अपेक्षितच होता. पक्ष आणि चिन्ह गेल्याने आम्हाला कोणताच फरक पडणार नाही. सर्वसामान्यांचा शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. खरे कोण हे मतदारच आगामी काळात दाखवून देतील, असे दुनेश्वर पेठे म्हणाले. निदर्शने आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू राऊत, वेदप्रकाश आर्य, अविनाश गोतमारे, प्रवीण कुंटे, जानबा मस्के, वर्षा श्यामकुळे, पंकज ठाकरे, श्रीकांत घोगरे, रेखा कृपाले, संतोष सिंह, शिव भेंडे, महेंद्र भांगे, रविनीश पांडे, राजा बेग, अर्शद सिद्दिकी, मोरेश्वर जाधव, राजूसिंग चव्हाण, प्रशांत बनकर, अस्विन जवेरी, सुनील लांजेवार आदी सहभागी झाले होते.

लोकशाहीनेच ‘त्यांना’ जागा दाखवली

समाजवादी पक्षात झालेला विवाद किंवा इतर पाच प्रकरणांत निवडणूक आयोगाने घेतलेल्या भूमिकेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचा निर्णय अपेक्षित होता, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पक्षात बहुमताने घेतलेला निर्णय महत्त्वाचा असतो. पक्षाची घटना काय होती, किती पालन केले, निवडणुका झाल्या की नाही, आता पक्ष कुणाचा आहे, अशा सर्व गोष्टींचा ऊहापोह निर्णयात केला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी राज्यात उत्तम काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यात २०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला, लोकशाही काय असते, हे त्यांना आज लक्षात आले असेल. आज जे ओरडत आहेत, त्यांनीच लोकशाहीचा मुडदा पाडला होता, लोकशाहीनेच त्यांना त्यांची जागा दाखवली, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *