[ad_1]

संतोष शिराळे, सातारा : जिल्ह्यातील पुसेसावळी येथे जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. गाव, तालुका व जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचे काही ठराविक मंडळी प्रयत्न करत आहेत. तो होऊ देऊ नका, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. पोलीस व प्रशासनाला मदत सहकार्य करा. पुन्हा एकदा बंधुत्वाचे जे संबंध पूर्वीपासून होते, ते प्रस्थापित करा, असं आवाहन देखील त्यांनी केलं. पुसेसावळीत जे घडलं ते काही दोन गटातील दंगल नाही. हा एका धार्मिक स्थळांमध्ये प्रार्थना चालली असताना झालेला हा हल्ला आहे. त्यामुळे बातम्या देताना दोन गटातील दंगल अशा चुकीच्या बातम्या पसरवू नका. जी घटना घडली आहे, त्या वस्तूनिष्ठ माहिती द्या असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

पुसेसावळी येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीस भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, मृत झालेल्या नूरहसन शिकलगार याच्या घरी भेट देऊन त्यांच्या आई-वडील आणि पत्नीची विचारपूस करून त्यांनी सांत्वन केले. तसेच जखमींच्या कुटुंबियांची विचारपूस केली. तसेच प्रार्थनास्थळाची पाहणी केली.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही समाजाच्या प्रतिनिधीशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच मंडल अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून आढावा घेतला.

चव्हाण म्हणाले, येथील घटनेची माहिती पोलीस प्रशासन देत आहे. मी फक्त मृत नूरहसन शिकलगार यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी व जखमीचे कुटुंबीय व गावकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी आलो आहे. पुन्हा एकदा गावामध्ये बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करा. कोणी तरी मुद्दाम पुढे येणाऱ्या राजकीय परिस्थितीमध्ये माथी भडकवायची प्रयत्न करत आहे . धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय, ते कोण आहेत, ते तपास पोलीस प्रशासन करेल. याचा अजून तरी विश्वास आहे, असं ही ते म्हणाले
फायनलसाठी टीम इंडियाने मागवला भन्नाट मॅचविनर खेळाडू, अक्षर पटेल संघाबाहेर
लवकरात लवकर काही माणसांना अटक केली आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भरपूर प्रचंड प्रमाणात पुरावे आहे. सीसीटीव्ही फुटेज आहेत. नावे लोकांनी सांगितली आहेत.गावातील लोकांना सर्वजण ओळखतात. बाहेरची लोकही परिचित आहेत. त्यामुळे पोलिसांकडे संपूर्ण पर्याप्त पुरावा आहेत. फक्त चौकशीचा देखावा न करता लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
कोरेगाव भीमा आयोग: एसपी, तत्कालीन मुख्य सचिव आणि फडणवीसांची साक्ष महत्वाची : प्रकाश आंबेडकर
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीला झाले आहे. उद्या पूर्वनियोजित कट असला,तर तो कुठेही घडू शकतो. महाराष्ट्रातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोण करीत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. पोलिसांशी सतत संपर्क आहे. माझा एवढाच विश्वास महाराष्ट्र सरकारकडून आहे, की जनतेचा विश्वास ढळणार नाही अशा प्रकारे निपक्षपाती चौकशी होऊन ते जबाबदार व्यक्ती असेल, त्यांना शासन झाले पाहिजे. इतर ज्या सूचना आहेत, त्या मी प्रशासनास करीन, असे त्यांनी शेवटी सांगितले.
Asia Cup 2023 Final चा सामना उशिरा का सुरु होणार, जाणून घ्या काय आहे मोठे कारण…

मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकीचा, पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी काय घोडं मारलंय; पृथ्वीराज चव्हाणांचा संताप

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *