[ad_1]
आता निवडणूक जवळ आली आहे. काही जण तुमच्याकडे येतील. माझी ही शेवटची निवडणूक असल्याचं म्हणतील. त्यांची ही त्यांची अखेरची निवडणूक खरंच असेल का ते मला माहीत नाही. पण तुम्ही भावनिक होऊन जाऊ नका. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांना टोला लगावल्याची चर्चा आहे. तुम्ही मला निवडणुकीत योग्य पद्धतीनं सहकार्य केलं तर पुढची कामं होतील. नाही तर मी पुढच्या कामांना बांधील नाही, असं अजित पवार पुढे म्हणाले.
जर माझ्या विचारांचा खासदार झाला तर पंतप्रधान मोदी साहेबांना मी सांगू शकेन की, मोदी साहेब माझ्या लोकांनी याला खासदार म्हणून निवडून दिले आहे. मी म्हणजे माझ्या, बारामतीकरानी, इंदापूरकरांनी, माझ्या दौंडकरांनी, भोर, वेल्हा, मुळशीकरांनी निवडून दिलेलं आहे. त्यामुळे माझ्या बारामतीकरांची कामं करायला हवीत, असं मी त्यांना हक्कानं सांगू शकेन, असं अजित पवार म्हणाले. आतापर्यंत आपल्या आजूबाजूला किती तरी आमदार आणि खासदार होऊन गेले. पण आपल्या अडचणींना कोण आपल्याला उपयोगी पडतंय याचाही विचार आपण करा, अजून खूप विकास कामे आपल्याला आपल्या परिसरात करायची असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
मी उमेदवार समजून मतदान करा
मला काही लोकांची गंमत वाटते. काहीना उपाध्यक्ष मी केलं, अध्यक्ष मी केलं, करोडो रुपयांची जागा नाममात्र दराने घेऊन दिली, कधीही कुठली अडचण येऊ दिली नाही. मात्र काय झालं माहीत नाही, त्यांचं जोरात काम चाललं आहे. काही जण मला मुंबईत भेटले. आमची चूक झाली म्हणाले. दादा तुमच्याशिवाय कुणी काम करू शकत नाही सांगू लागले, असं अजित पवार म्हणाले.
काही काहींची तर इतकी पंचायत आहे. मला टीका टिप्पणी करायची नाही. उद्याच्याला लोकसभा निवडणूक अगोदर आहे. नंतर विधानसभा आहे. यामुळे महायुती लवकरच आपला उमेदवार जाहीर करेन. मी उमेदवार समजून मला मतदान केलं पाहिजे. काही जण आजही गटातटाचं राजकारण करतात. दुसऱ्या गटातील लोकांची नावं घेणं टाळतात. असं राजकारण करू नका. त्याचा त्रास मला होतो, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.
[ad_2]
Source link