[ad_1]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले या दोघांना अटक केली आहे. वर्षा या महिलेला दारुचे व्यसन होते. अब्दुल सय्यद हा अंडा भूर्जीचा व्यवसाय करतो. १० ते १५ दिवसांपूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता. हा मोबाईल मृत महिलेनं चोरल्याचा त्याला संशय आला. या संशयावरून त्याने आणि गौरव यांनी त्या महिलेकडे मोबाईलबाबत विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्यांनी वर्षा या महिलेच्या डोक्यात काठीने मारहाण केली. घाव डोक्यात बसल्याने महिला खाली कोसळली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. फरासखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन त्यांनी या दोन जणांना अटक केली आहे.
औंध परिसरात नेमकं काय घडलं?
पुण्यातील औंध परिसरात एकावर गोळीबार करून हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अनिल ढमाले, असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढमाले याने आकाश जाधव याच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये आकाश हा गंभीर जखमी झाला असून त्यास ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
त्यानंतर ढमाले ते रिक्षाने चतु:शृंगीकडे येत असताना काही अंतर येऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. हा सर्व प्रकार आर्थिक देवाण-घेवाणीमधून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. व्यावसायिक वादातून ढमालेने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. अद्याप पोलिसांकडून अधिकृतरित्या माहिती मिळालेली नाही.
[ad_2]
Source link