[ad_1]

नवी दिल्ली: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा याची चर्चा सुरू झाली आहे. ईडीने हेमंत सोरेन यांना अटक करण्याआधी १० नोटीस बजावल्या होत्या. बुधवारी राजधानी रांचीत तास चौकशी केल्यानंतर सोरेन यांनी राजीनामा दिला आण ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना राजभवनातून थेट ईडीच्या कार्यालयात नेले.

हेमंत सोरेन प्रमाणेच देशातील अनेक मुख्यमंत्री ईडीच्या रडारावर आहेत. त्यात सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होय. ईडीने केजरीवाल यांना आतापर्यंत ५ नोटीसा पाठवल्या आहेत. अटकेपासून वाचण्यासाठी सोरेन यांनी अनेक मार्ग शोधले आता तसेच प्रयत्न केजरीवाल यांना शोधावे लागतील. अर्थात सोरेन यांच्यानंतर केजरीवाल एकटेच नाहीत, तर त्यांच्यासोबत अन्य काही मुख्यमंत्र्यांची नावे आहेत. यात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी यांचा समावेश आहे. अर्थात जगनमोहन रेड्डी यांना सध्या तरी फार धोका नाही. कारण ते भाजप सोबत मैत्री ठेवून आहेत.

या शिवाय बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांची देखील चौकशी झाली आहे. इतक नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार देखील चौकशीच्या फेऱ्यात आहेत.

पुढचा नंबर कोणाचा

जेएमएमचे नेता हेमंत सोरेन यांच्यानंतर आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा नंबर लागू शकतो. दिल्लीतील थंडीच्या लाटेनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांवर निवडणुकीचा किती परिणाम होतो हे पहावे लागले. जर ईडीने कारवाई केली तर त्याचा नेत्यांच्या राजकीय करिअरवर आणि निवडणुकीच्या समीकरणावर परिणाम होऊ शकतो.

कोणावर काय आरोप

अरविंद केजरीवाल- ईडीने केजरीवाल यांना ५ नोटीसा पाठवल्या आहेत. दिल्लीतील मद्य धोरणा संदर्भात ईडीने १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केलाय. केजरीवाल यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. या प्रकरणी पक्षाचे दोन नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हे तुरुंगात आहेत. ताज्या नोटीसीनुसार केजरीवाल यांना २ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर व्हायचे आहे.

रेवंत रेड्डी- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळून देणारे रेवंत रेड्डी यांच्यावर मनी लँन्ड्रिंगची केस आहे. नव्याने मुख्यमंत्री झालेल्या रेड्डी यांच्यावरील आरोप हे आताचे नाहीत तर जेव्हा ते आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षात होते तेव्हाचे आहेच. २०१५ साली एमएलसी निवडणुकीत आपल्या पक्षाला मत देण्यासाठी एका आमदाराला ५० लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.

पिनराई विजयन– केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन यांच्याविरुद्धचा आरोप फार जुना आहे. ते ऊर्जा मंत्री असताना कॅनडाच्या एका कंपनीला प्रोजेक्टचे काम देताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने १९९५ साली आरोपपत्र दाखल केले होते आणि २०२१ साली ईडीने पुन्हा चौकशी सुरू केली.

जगनमोहन रेड्डी- आंध्रचे मुख्यमंत्री रेड्डी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केंद्रात युपीए सरकार असल्यापासूनचे आहेत. तेव्हा त्यांना काही महिने तुरुंगात रहावे लागले होते. २०१५ साली ईडीने त्यांची कंपनी भारती सीमेंटमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. २०१९ साली मुख्यमंत्री झाल्यानंतर ते एनडीए आघाडीत आले नाहीत. पण त्यांनी सातत्याने भाजपला पाठिंबा दिलाय.

बिहारमधील सत्ता गेल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले. त्यांचे वडील लालू यादव आणि आई राबडी देवी यांच्यावर IRCTC मध्ये नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर गोमती रिव्हर फ्रंट प्रोजेक्ट आणि खान घोटाळ्याचा आरोप आहे. याची चौकशी ईडी आणि सीबीआयकडून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युपी आणि बिहारमध्ये कारवाई होऊ शकते.

काँग्रेस नेत्यांची यादी मोठी

ईडीच्या हिट लिस्टमध्ये सर्वाधिक काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी झाली आहे.छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, सचिन पायलट, कार्ति चिदंबरम, गुजरात काँग्रेसचे नेते शंकर सिंह वाघेला यांची चौकशी सुरू आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *