[ad_1]

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आर. अश्विनचे भारतीय संघात आगमन झाले आणि सर्वांनाच धक्का बसला. कारण अश्विन हा गेल्या दीड वर्षात फक्त दोनच वनडे सामेन खेळला होता. त्यामुळे त्याला संघात प्रवेश आत्ताच्या घडीलाच प्रवेश कसा काय दिला, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आता या प्रश्नाचे खरं उत्तर भारतीय संघाचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी दिले आहे.

आगरकर यांनी सांगितले की, ” आम्हाला संघनिवडीसाठी पर्याय हवे आहेत. वर्ल्ड कपसाठी संघ अंतिम करण्यापूर्वी आम्ही अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदरच्या कामगिरीचा आढावा घेत आहोत. त्यामुळेच त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी निवड केली आहे. संघव्यवस्थापनास उपलब्ध परिस्थितीनुसार निर्णय घेण्यापूर्वी पर्याय असावेत हाच विचार केला आहे. त्यानुसारच केवळ अश्विनच नव्हे, तर वॉशिंग्टन सुंदरला निवडले आहे.”

याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, ” अश्विन हा काही वर्षात किती वन-डे खेळला ही आकडेवारी महत्त्वाची नाही. तो अनुभवी आहे. कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटशी जुळवून तो घेऊ शकतो. आम्ही त्याच्याबरोबर या संदर्भात दीर्घ चर्चा केली आहे. त्याची निवड करण्यापूर्वी तंदुरुस्तीही जाणून घेतली आहे.”

या मालिकेसाठी निवडण्यात आलेले दोन्ही संघ कसे आहेत, जाणून घ्या…
पहिल्या दोन वन-डेंसाठी ः लोकेश राहुल (कर्णधार – यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, महंमद सिराज, महंमद शमी, तिलक वर्मा, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.

तिसऱ्या वन-डेसाठी ः रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, महंमद सिराज, महंमद शमी, कुलदीप यादव, अक्षर पटेल (तंदुरुस्त असल्यास), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.

फायनल जिंकून टीम इंडिया हॉटेलमध्ये परतल्यावर क्रिकेटप्रेमींचा जल्लोष

अश्विनची कामगिरी

११३ वन-डे

१५१ विकेट

शेवटची वन-डे
२१ जानेवारी २०२२

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *