[ad_1]
राहुल गांधी यांनी घटनेचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर केला आहे. राहुल गांधी या प्रसंगी बसमूधन खाली उतरले होते. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना पुन्हा बसमध्ये बसण्यास सांगितलं.
काँग्रेसनं ट्वीट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. आसाम काँग्रेस अध्यक्ष भूपेनकुमार बोराह यांनी भाजपच्या गुंडांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण करण्यात आली. हा भाजपच्या द्वेषाच्या मानसिकतेचा पुरावा असल्याचं काँग्रेसनं म्हटलं.
काँग्रेसनं दावा केला की सोनितपूरमध्ये जयराम रमेश आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या कॅमेरा क्रूवर हल्ला करण्यात आला आहे. जयराम रमेश म्हणाले की सोनितपूरच्या जुमुगुरीघाट येथे भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि गाडीवर लावण्यात आलेले भारत जोडो न्याय यात्रेचे स्टीकर देखील फाडून टाकले. गाडीवर पाणी फेकण्यात आलं, भारत जोडो न्याय यात्रेविरोधात घोषणा देण्यात आल्या पण आम्ही संयम ठेवला, असं जयराम रमेश म्हणाले.
जयराम रमेश यांनी या प्रकरणी आसामच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप केले. हिमंता बिस्वा सरमा हे सर्व करत आहेत, असा दावा रमेश यांनी केला. आम्ही घाबरणार नाही, संघर्ष करत राहू, असं जयराम रमेश म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा २० मार्च रोजी मुंबईत पोहोचणार आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
[ad_2]
Source link