[ad_1]

मुंबई: ‘आई कुठे काय करते’मध्ये आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला अनघा आणि अभी एक रोमँटिक क्षण शेअर करतात. देशमुखांच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेसाठी सर्वजण तयारी करत असतात. कांचन आणि अप्पांची लेक विशाखाही पूजेनिमित्त घरी आलेली असते. तेव्हा गुरुजी सुचवतात की ईशा आणि अनिश या नवदाम्पत्याने पूजा केली तर? तेव्हा कांचन आजी म्हणतात की त्यांचं अजून विधीवत लग्न झालेलं नाही आणि तसंही ईशा देशमुखांची मुलगी आहे. त्यांच्या लग्नानंतर केळकरांकडे पूजा होईलच, असं कांचन आजी सांगतात.

अरुंधती, आशुतोष आणि अरुंधतीचा भाऊदेखील या पूजेला येतात. अरुंधती विशाखाला केदारबाबत विचारते तेव्हा ती काहीशी गोंधळून उत्तर देते. यानंतर अप्पा आशुतोषला विचारतात की बाकीचे लोक का नाही आले पूजेला? अनिरुद्धही ईशा-अनिशबद्दल विचारतो. त्याला लगेचच आठवतं की त्याने ईशाशी संबंध तोडले आहेत. नेमकं याच वेळी ईशा-अनिश पोहोचतात. ईशा म्हणते की इतकं सगळं होऊनही तुम्हाला माझी आठवण आली, बरं वाटलं.

‘ठरलं तर मग’मध्ये काय चाललंय? मीरा जगन्नाथनंतर या कलाकाराची एक्झिट; लोकप्रिय खलनायकाची एन्ट्री
ईशाला पाहताच अनिरुद्धचा पारा चढतो. तो म्हणतो की तुम्हाला का पूजा घालायची ती घाला, मी त्याच्या आड येणार नाही. अप्पा त्याला हा कडवटपणा सोडून द्यायला सांगतात. तेव्हा अनिरुद्ध चिडून म्हणतो की एखाद्याला विष द्यावं त्याप्रमाणे हा कडवडपणा मला इतरांनी दिला आहे. ईशा त्याची माफी मागायचा प्रयत्न करते, पण तो काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. मला फक्त २ मुलं आहेत, असंच तो ठणकावून सांगतो.

जेव्हा पूजा करण्यासाठी ईशा आणि अनिश पुढे येतात तेव्हा कांचन आजी त्यांना थांबवून अभी-अनघाला पूजेला बसायला सांगतात. तेव्हा अनघा म्हणते की ईशा-अनिशला बसू दे पूजेला. तेव्हा कांचन आजी म्हणतात की या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला नाही, पूजेला अभी-अनघाच बसणार. झाला प्रकार पाहून ईशा घराबाहेर निघून जाते. अनिश तिला आणायला जातो पण ती समजावण्याच्या पलीकडे गेलेली असते. आजीने पूजेला अपमान करण्यासाठी बोलावल्याचं तिला वाटत असतं. अनिश तिला म्हणतो की आपलं विधीवत लग्न झालेलं नाही त्यामुळे पूजेला बसू दिलं नाही, मोठ्यांची प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची नसते असं तो तिला समजावतो. मात्र ईशा तिच्या रागावर ठाम असते. तिच्या सर्वात चांगल्या दिवसाची या घरच्या मंडळींनी माती केली असं तिचं मत असतं.

ठिपक्यांची रांगोळी फेम अभिनेत्रीचा मुलगा रमला हॉटेल व्यवसायात; ठाण्यात सुरू केलं पावभाजी सेंटर
ईशाच्या त्राग्यानंतर अनिश तिला एकच प्रश्न विचारतो की ज्यांनी माती केली असं वाटतंय तर त्यांच्याकडून कोडकौतुकाची अपेक्षा का करतेय? तो तिला विचारतो की तुझा या सगळ्यांवर एवढा राग आहे तर त्यांनीच तुझ्या लग्नाचा तामझाम करावा असं तुला का वाटतं आहे? ईशाला तो समजावतो की आपण देवळात लग्न करुनही त्यांनी आपल्याला स्वीकारलं हा त्यांचा मोठेपणा आहे. ईशाला अजूनही असंच वाटत असतं की तिच्या आईमुळे तिला असं टोकाचं पाऊल उचलावं लागलं. ईशाला पूजेसाठी बोलावायला आलेल्या विशाखालाही ती सुनावते. सारं जग तिच्याविरोधात आहे, अशीच ईशाची भावना असते. दुसरीकडे अनघा आणि अभी मोठ्या भक्तिभावाने सत्यनारायणाची पूजा करतात.

काय होणार पुढील भागात?

पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, ईशा विशाखाकडे हट्ट करते की तिच्या लग्नात केदार काका अर्थात विशाखाचा नवरा यायलाच हवा. यशही केदार काका यायलाच हवा असं म्हणतो. तेव्हा न राहवून विशाखा मोठ्याने ओरडते की केदार येणार नाही म्हणजे नाही. जेव्हा अरुंधती तिला तिच्या खोलीत नेऊन नेमकं काय झालं विचारते तेव्हा विशाखा सांगते की केदारने तिच्याकडे घटस्फोट मागितला आहे. त्यांचं हे बोलणं अप्पा ऐकतात आणि त्यांच्याही पायाखालची जमीन सरकते.

‘ज्ञानेश्वर माऊली’ मालिकेत उभारलेल्या आळंदीचे दर्शन; मुक्ताबाई म्हणजेच सायली गावंडसोबत सेटची सफर

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *