[ad_1]

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नव्या राजकीय आयुष्याला सुरुवात करत आहे. गेल्या ३८ वर्षांचा प्रवास बदलून नवा मार्ग स्वीकारला आहे. नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन देशाच्या आणि राज्याच्या विकासात योगदान देता यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे, असं चव्हाण म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानतो, असं म्हटलं.

मी जिथं होतो तिथं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही देणार आहे. आगामी निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे. राजकारण हे सेवेचं माध्यम आहे. मी कुणावरही टीका करणार नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.

मी पक्ष सोडल्यानंतर कोणावरही टीका करणार नाही. नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन देशात विकासाचं काम केलं आहे. त्यांच्या कामानं प्रभावित झालेलो आहे. विरोधी पक्षात असताना सरकारनं जे चांगलं काम केलेलं असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. महाराष्ट्राची एक वेगळी राजकीय संस्कृती राहिलेली, असं अशोक चव्हाण म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
अशोक चव्हाणांच्या हाती भाजपचा झेंडा; फडणवीस म्हणतात, त्यांना पदाची कुठलीही अपेक्षा नाही
सभागृहात कटुता आली असली तरी सभागृहाबाहेर सर्वांनी चांगले संबंध जपलेले आहेत. मी नवी सुरुवात करत आहे, भाजपच्या ध्येयधोरणांनुसार काम करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणं काम करणार आहे. मी यापूर्वीच्या पक्षातील सहकाऱ्यांचे आभार मानतो. माझा हा वैयक्तिक निर्णय होता, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं. सर्व गोष्टींवर आज बोलण्यापेक्षा योग्यवेळी बोलणार असल्याचं चव्हाण म्हणाले. सकारात्मक आणि विकासाचं धोरण डोळ्यासमोर ठेवून भाजपमध्ये आलो असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *