[ad_1]

अहमदाबाद: वर्ल्डकप २०२३च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत भारताचा कर्णधार रोहित शर्माने धमाकेदार सुरूवात केली. पण हिटमॅनला मोठी खेळी करण्यात अपयश आले. चांगल्या लयीमध्ये दिसत असताना रोहित शर्मा अचानक बाद झाला. रोहितच्या विकेटने नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित १ लाख ३२ हजार प्रेक्षक शांत झाले.

वर्ल्डकपमधील रोहितचे आणखी एक अर्धशतक हुकले. सलग दुसऱ्या सामन्यात तो ४७ धावांवर बाद झाला. याआधी सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध देखील रोहित ४७ धावांवर बाद झाला होता. रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर देखील लगेच माघारी परतला. त्यानंतर देखील भारतीय फलंदाजांना फार चमकदार कामगिरी करता आली नाही. फायनल मॅच असल्याने भारतीय चाहत्यांची काळजी वाढली असताना एक दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे.

वर्ल्डकप फायनलमध्ये बॅटिंग करण्याची ही कोणती पद्धत? षटकार मारण्याची हौस नडली, कॅप्टन रोहितच्या चूकीचा संघाला बसला मोठा फटका
रोहित शर्माचे ४७ धावांवर बाद होणे हे भारतासाठी शुभ आहे. याआधी रोहित सेमीफायलनमध्ये ४७ वर बाद झाला होता. तेव्हा त्याने फक्त २९ चेंडूत ४७ धावा केल्या होत्या. रोहितच्या या धमाकेदार सुरुवातीमुळे भारताला ३९७ धावांपर्यंत मजल मारता आली होती.

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने केली मोठी चूक; रोहित शर्माने टॉस गमावला अन् भारताने वर्ल्डकपच जिंकला, असा आहे विजयाचा X फॅक्टर
संपूर्ण स्पर्धेत रोहितने संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली आहे. पहिल्या १० ते १५ षटकात जोरदार सुरुवात करून दिल्याने भारताला मोठी धावसंख्या उभी करता आली. रोहितच्या अशा प्रकारच्या फलंदाजीमुळे त्याचे वैयक्तीक अनेक रेकॉर्ड हुकले. अफगाणिस्तानविरुद्ध रोहितने १३१, पाकिस्तानविरुद्ध ६३ चेंडूत ८६, इंग्लंडविरुद्ध ८७, नेदरलँड्सविरुद्ध ६१ , बांगलादेशविरुद्ध ४८, न्यूझीलंडविरुद्ध ४६ आणि आफ्रिकेविरुद्ध ४० धावा केल्या होत्या.

ICCने स्वत: सांगितले टीम इंडिया वर्ल्डकप फायनलमध्ये काय करू शकते; टॉसच्या आधी आली मोठी अपडेट
Read Latest Sports News And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *