[ad_1]

रायगड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. गणपतीच्या आधी या महामार्गावरील एका लेनचे काम पूर्ण करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गेली बारा वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने आता आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. खड्डेमय झालेला रस्ता गणेशोत्सवापूर्वी चांगला व्हावा यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. सिमेंट ट्रिटेड बेस हे नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हे काम सुरु करण्यात आलं आहे.

या मशीनद्वारे दिवसाला ५०० मीटर इतकं काम होऊ शकतं, मात्र त्यासाठी पावसाची उघडीप असावी लागते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर हे काम जलद गतीने होण्यासाठी तूर्तास दोन मशीन असल्या, तरी या मशीनची संख्या वाढवून जास्तीत जास्त काम कसं होईल, याकडे आपण लक्ष देत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.

अहो आश्चर्यम्! विहिरीत वळवळणारा नाग बाहेर काढला, तोंडातून दुसरा नाग बाहेर पडला, VIDEO समोर
या आधुनिक मशीनच्या सहाय्याने जुना रस्ता खोदून त्यामध्ये सिमेंट टाकून व काही केमिकलचा वापर करून हा रस्ता बनवण्याचं काम हे रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे येथून सुरू करण्यात आले आहे. तसेच या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केलेलं काम हा बेस अधिक मजबूत असल्यामुळे पंधरा ते वीस वर्षे टिकू शकतो, असा मोठा दावा या आधुनिक तंत्राद्वारे करण्यात आला आहे.

कोकणात मुंबई गोवा महामार्ग रखडला असून रायगड जिल्ह्यात या महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या गाड्या वाटेतच पंक्चर होण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच अनेकांना पाठदुखी सारखे आजार उद्भवले आहेत. या सगळ्या विरोधात अलिकडे जन-आक्रोश आंदोलन समितीकडून हे मोठे आंदोलन करण्यात आलं होतं.

माकडाने दरीत फेकलेल्या पर्समध्ये होते ३५ हजार, जीव धोक्यात घालून ‘ते’ २०० फूट उतरले, अन्…
मराठी पत्रकार परिषदेकडूनही याच हायवेचं काम तात्काळ मार्गी लागावं यासाठी रायगड जिल्ह्यात आजच वाकण फाटा येथे पत्रकार आंदोलन करणार आहेत. इतकेच नव्हे तर दोन मंत्री व दोन खासदार यांना एसएमएस करून आपला संताप कळवणार आहेत. देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये सगळ्यात रखडलेला कोकणातील हा मुंबई गोवा महामार्ग आहे. त्यामुळे या रखडलेल्या एकंदरच कामाबद्दल नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे.

समृद्धी झाली अतिवेगानं इथं पोकळ आश्वासन, मुंबई-गोवा हायवेचं कामच रखडलं! कोकणवासियांनी मांडली व्यथा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *