[ad_1]
नाना पटोले काय म्हणाले?
एकतर भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मुर्ख समजतात. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत, असा आरोप भाजपने वारंवार केला. त्यानंतर भाजपने अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमिरा लावला. अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात दाखल झाले, हा कृतीचा परिणाम आहे.
आता प्रश्न असा आहे की, कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते त्यांनी नेमकं असं काय पुण्य केलं ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले? निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते, अशआ शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर बोचरा वार केला आहे.
अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करताना काय म्हणाले?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा नावलौकिक वाढवला. त्यामुळे त्यांचं काम हे वाखाण्याजोगं आणि प्रशंसनीय आहे. त्यांनी मला भाजपात प्रवेश दिला, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. महाराष्ट्रात सत्तााधारी आणि विरोधकांचे संबंध कायमच राजकारणापलिकडे असतात. आज मी नव्या राजकीय आयुष्याला सुरुवात करतोय. पंतप्रधान मोदींकडून प्रेरणा घेऊन सकारात्मक भूमिका घेऊन वाटचाल करणार आहे, असं पक्षप्रवेश करतावेळी अशोक चव्हाण म्हणाले.
[ad_2]
Source link