[ad_1]

मुंबई- ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ते ‘देवों के देव महादेव’ सारख्या लोकप्रिय मालिकांचा भाग असलेल्या चारू असोपाने इंडस्ट्रीमागचे काळे सत्य समोर आणले आहे. तिने आपल्या करिअरमध्ये कास्टिंग काउचचा कसा सामना केला हे सांगितले. या गोष्टीमुळे एकदा तिला इतका ताप आला की तीन दिवस ती अंथरुणातून उठली नव्हती. चारू असोपाने सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसोबत लग्न केले होते. दोघांना एक मुलगी आहे. पण काही काळापूर्वी राजीव आणि चारूचा घटस्फोट झाला.

बिकानेरहून मुंबईत आलेल्या चारू असोपाने सांगितले की, तिच्यासाठी या मायानगरीत येणे खूप कठीण होते. सुरुवातीच्या काळात मुंबईत गेले तर कामही मिळेल, असं तिला वाटायचं. आपण नायिका बनू आणि प्रेक्षकांची मनं जिंकू असं तिला वाटायचं. मात्र मुंबईत आल्यानंतर चारूला कलाकारांचा खरा संघर्ष आणि जीवन कळले.

विदेशात झालं कार्तिक आर्यनचं स्वयंवर, चाहतीने लग्नाची मागणी घालताच लाजेने चूर झाला अभिनेता
चारू असोपाचे संपूर्ण कुटुंब आले

चारू असोपाने सांगितले की, जेव्हा ती पहिल्यांदा मुंबईत आली होती तेव्हा तिचे संपूर्ण कुटुंब तिच्यासोबत होते. काही दिवसांनी भाड्याने घर घेतल्यावर वडील आणि भाऊ पुन्हा बिकानेरला गेले. आई माझ्यासोबत राहिली. सुरुवातीला काम कसे मिळवायचे, काय करायचे हे समजत नव्हते. मुंबईत मी कोणालाच ओळखत नव्हती. पण हळू हळू मला समजू लागलं.

अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या कुटुंबासोबत घराबाहेर झाली स्पॉट

आईने मुलीची साथ सोडली नाही

चारू असोपाच्या आईलाही इंडस्ट्रीबद्दल भीती वाटत होती, कारण त्यांनी इथल्या कामाबाबत लोकांच्या तोंडून अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. अशा परिस्थितीत त्यांनी मुलीला एकटे जाऊ दिले नाही. सुरुवातीला चारूने किशोर नमित कपूर स्कूलमध्ये प्रवेश घेतला. इथेच तिला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या ऑडिशनबद्दल कळलं. या मालिकेत तिला ७-८ महिन्यांसाठी खास भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यादरम्यान तिला ‘महादेव’ही मालिकासुद्धा मिळाली.

मुस्लिम मुलीशी लग्न करायला सुनील शेट्टीने केलेलं जीवाचं रान, वाचा त्याचा सुखी वैवाहिक मंत्र
चारू असोपाने कास्टिंग काउचचा सांगितला किस्सा

त्याचवेळी चारू असोपाने कास्टिंग काउचवर खुलासा केला की, ती जेव्हा मुंबईत आली तेव्हा ती २०-२१ वर्षांची होती. एकदा तिला एका मोठ्या निर्मात्याचा चित्रपटांसंदर्भात भेटायला बोलवण्यासाठी फोन आला. ती म्हणाली, ‘मी ज्या प्रोडक्शन हाऊसबद्दल बोलत आहे ते खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर कास्टिंग डायरेक्टरने माझ्यासमोर एक कॉन्ट्रॅक्ट ठेवला. माझ्या हातात पेन होता आणि सही करणार होते. पण नंतर तो असे काही म्हणाला की, मला तीन दिवस ताप ताप आलेला. यानंतर मी हात जोडून स्पष्टपणे नकार दिला.

‘तुम्ही नाही केले तर दुसरे कोणी करेल’

चारू असोपाने सांगितले की, तेव्हा त्या कास्टिंग डायरेक्टरने मला सांगितले होते की, तू असं नाही केलं तर बाहेर बसलेल्या मुली करतील. यावर ती फक्त ठिक आहे सर म्हणाली होती.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *