[ad_1]

मुंबई : भारतीय संघ सध्या U19 World Cup 2024 जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. पण यापूर्वीही भारताने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकले आहेत. पण भारतासाठी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकणारे कर्णधार सध्या काय करत आहेत, हे आता समोर आले आहे.

मोहम्मद कैफ (२०००)
भारताने सर्वात पहिल्यांदा हा वर्ल्ड कप जिंकला तो २००० साली आणि त्यावेळी भारताचा कर्णधार होता मैहम्मद कैफ. या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. त्यानंतर मोहम्मद कैफला भारतीय संघात स्थान मिळाले. कैफ हा भारताकडून २०००-२००६ या कालावधीत आंतरराष्ट्री. स्तरावर खेळला. कैफने दमदार फलंदाजी तर केलीच पण अचूक क्षेत्ररक्षणासाठी तो ओळखला जायचा. नॅटवेस्ट मालिकेतील अंतिम सामना कैफने भारताला जिंकवून दिला होता आणि त्यानंतर तो भारताचा हिरो ठरला होता. सध्याच्या घडीला कैफ हा समालोचन करत आहे.

विराट कोहली (२००८)
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने २००८ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आणि विश्वचषकाला गवसणी घातली होती. त्यानंतर विराट कोहली हा भारतीय संघात आला. २०११ च्या वर्ल्ड कप विजयी संघात कोहली होता. कोहली अजूनही भारतीय संघात आहे आणि वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम आता त्याच्या नावावर आहे. सध्याच्या घडीला कौटुंबिक कारणास्तव तो भारताच्या कसोटी संघात नाही, पण आयपीएलमध्ये मात्र तो खेळताना दिसेल.

उन्मुक्त चंद (२०१२)

उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१२ साली वर्ल्ड कप जिंकला. या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ६ विकेट्स राखून पराभूत केले. या सामन्यात चंदने १११ धावांची दमदार खेळी साकारली होती. त्यानंतर चंद भारतीय संघात येईल, असे वाटत होते. पण तो भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. चंदने वयाच्या २८ व्या वर्षी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या घडीला चंद हा अमेरिकेकडून क्रिकेट खेळत आहे.

पृथ्वी शॉ (२०१८)
पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८ साली झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्स राखून दणदणीत पराभव केला होता. या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये पृथ्वीने २६१ धावा केल्या होत्या. त्यानंतर पृथ्वीने भारताच्या कसोटी संघात एंट्री केली. पदार्पणाच्या सामन्यात पृथ्वीने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले होते. त्यानंतर काही कालावधीनंतर पृथ्वी हा डोपिंगमध्ये अडकला होता. त्याच्यावर ८ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर पृथ्वीच्या धावांचा आलेख घसरला आणि त्याला भारतीय संघातून काढण्यात आले. सध्या पृथ्वी पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

यश धुल (२०२२)
भारताने २०२२ साली इंग्लंडला पराभूत करत १९ वर्षांखालील वर्ल्ड कपला गवसणी घातली होती. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार होता ता यश धुल. यशने या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये २२९ धावा केल्या होत्या. त्यानंतर यशला आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या ताफ्यात संधी दिली होती. दिल्लीच्या रणजी संघाकडूनही तो खेळत आहे. रणजी स्पर्धेच्या पदार्पणाच्या सामन्यात यशने दोन्ही धावांत शतक झळकावले होते. त्यानंतर त्याला संघाचे कर्णधार बनवण्यात आले. पण कर्णधार म्हणून त्याला छाप पाडता आलेली नाही.

१ लाख ३० हजार प्रेक्षकांनी खचाखच भरलं मोदी स्टेडियम

भारताचे १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेते हे पाच कर्णधार झाले, ते सध्या काय करतात हे तुम्ही पाहिले. आता या वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार उदय सरहन आहे. तो यापुढे कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर भारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये विजय मिळवतो का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *