[ad_1]

नवी दिल्ली: अविश्वास प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. मोदींनी विरोधकांनी नव्याने तयार इंडिया या आघाडीच्या नावावरून समाजार घेतला. तुम्ही एनडीएकडून हे नाव चोरले आणि इंडियाचे तुकडे I.N.D.I.A असे केले.

युपीएला वाटते की देशाच्या नावाचा वापर करून विश्वासार्हता वाढले. पण काँग्रेसचे सहकारी पक्ष असलेल्या तामिळनाडूमधील सरकारच्या एका मंत्र्याने दोन दिवसांपूर्वी असे म्हटले होते की, इंडिया आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. त्यांच्यामते तामिळनाडू भारतात नाहीच. मी आज आभिमानाने सांगू इच्छितो की तामिळनाडू असा प्रदेश आहे ज्याने नेहमी देशभक्ती दाखवली. ज्या राज्याने आम्हाला राजा जी दिले, कामराज यांना दिले, एनजीआर, कलाम दिले त्या राज्यातून आज अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत.
भारतालाही तोडले

इतके नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी I.N.D.I.A. आघाडीवर हल्ला चढवला. मोदी म्हणाले, “त्यांचा त्रास एवढा आहे की, स्वतःचे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी त्यांना एनडीएचा आधार घ्यावा लागला. पण सवयीप्रमाणे ‘मी’चा अहंकार त्यांना एकटा सोडत नाही. त्यामुळेच त्यांनी दोन ‘मी’ टाकले. NDA मधील अहंकार. पहिला ‘I’ – २६ पक्षांचा अहंकार आणि दुसरा ‘I’ – एका कुटुंबाचा अहंकार. त्यांनी NDA सुद्धा चोरला. त्यांनी भारतालाही तोडले”.

२०२८ साली जेव्हा तुम्ही अविश्वास प्रस्ताव आणाल तेव्हा भारत…; PM मोदींची आणखी एक भविष्यवाणी
काँग्रेसवर हल्ला

काँग्रेस पक्षावर हल्ला चढवताना मोदींनी म्हटले की, त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी या त्यांच्या नाहीत. निवडणूक चिन्हासह सर्व काही आपले असल्याचा दावा काँग्रेस करत असते. पण प्रत्यक्षात ते दुसऱ्यांकडून चोरले आहे. स्वत:चे दोष लपवण्यासाठी त्यांनी चिन्ह आणि विचार देखील चोरले. पक्षाचे संस्थापक एक विदेशी व्यक्ती होते. १९२० साली देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात नवी उर्जा मिळाली तर त्यांनी ध्वज देखील चोरला. काँग्रेसने या ध्वजाची ताकद ओळखली आणि तोच स्विकारला. मतदारांना आकर्षिक करण्यासाठी गांधी नावाची देखील चोरी केली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *